शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मुंजवाड येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: October 29, 2014 22:17 IST

वाढती लोकसंख्या : पाणीप्रश्न सुटण्याची आशा

मुंजवाड : येथे राष्ट्रीय पेयजल (भारत निर्माण) योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ एन. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, सरपंच गणेश जाधव, उपसरपंच विजय सूर्यवंशी उपस्थित होते.दहा वर्षापूर्वीं गावाला जल स्वराज्य योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना साकारण्यात आली होती. त्यानंतर गावाचा विस्तार वाढला. सावतानगर व इंदिरानगर परसिरासह गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असे. तसेच उन्हाळ्यात जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावत असल्याने तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी सरपंच गणेश जाधव व उपसरपंच विजय सूर्यवंशी यांनी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६१ लक्ष रु.ची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नवीन विहिर, पाण्याची टाकी येथून सावतानगर व इंदिरानगर वसाहतीत जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजनप्रसंगी माजी पोलिसपाटील तुकाराम जाधव, माजी सरपंच सुशीला जाधव, गुलाब जाधव, दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील जाधव, रमेश निकम, खंडू पिंपळसे, एन. टी. जाधव, शंकर जाधव, हरिकांत सूर्यवंशी, शंकर पगारे, माजी सरपंच नंदू जाधव, देवीदास जाधव, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे, निवृत्ती खैरनार, भिका जाधव आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)