शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST

नाशिक : सामाजिकता आहे म्हणून शाहीर शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते. मनोरंजनापेक्षा प्रबोधनालाच हत्यार बनविण्याचे काम शाहिरांनी केले, ...

नाशिक : सामाजिकता आहे म्हणून शाहीर शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते. मनोरंजनापेक्षा प्रबोधनालाच हत्यार बनविण्याचे काम शाहिरांनी केले, असे प्रतिपादन लोककलेचे अभ्यासक रमेश कदम यांनी केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृतिप्रीत्यर्थ दुसरे पुष्प कदम यांनी गुंफले, यावेळी ते बोलत होते. शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचे उद‌्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दुसऱ्या वर्षी व्याख्यानमाला डिजिटल पद्धतीने घेण्यात आली. विचारांचे प्रभुत्व माणसांच्या जीवनावर पडते, विचार बदलले की आयुष्य बदलते, वसंत व्याख्यानमालेने हाच प्रभाव कायम ठेवला, असे मनोगत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या मालेचे दुसरे पुष्प रमेश कदम यांनी ‘शाहिरी क्षेत्राचे सामाजिक योगदान’ या विषयावर गुंफले.

यादरम्यान कदम यांनी शाहीर अमर फंदी, अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर साबळे, वामनदादा कर्डक, गजाभाऊ बेणी यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रारंभी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले. याप्रसंगी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, उपाध्यक्ष विजय हाके, अविनाश वाळुंजे, विजय काकड, सुनील गायकवाड आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंतवणूक सल्लागार पंकज नेरे यांनी गुंफले, ‘अर्थ नियोजनाचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर बोलताना अर्थ असेल तरच जीवनाला महत्त्व असल्याचे सांगितले. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो, आणि उरलेला पैसा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवला जातो. बऱ्याचदा पैसे कमविण्यास महत्त्व दिले जाते; पण पैशांच्या व्यवस्थापनाकडे काणाडोळा केला जातो, असे करणे अयोग्य असल्याचे नेरे यांनी सांगितले. साधनसंपत्तीचे विवेकाने सुनियोजन करून प्रत्येकाने आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची गरजही पंकज नेरे यांनी व्यक्त केली तर सचिन उषा विलास जोशी यांनी कोरोनाकाळात भावनिक व्यवस्थापनदेखील आवश्यक असल्याने मेडिटेशन करावे, असे सांगितले. महामारीच्या काळात जनतेपर्यंत चांगले विचार पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

इन्फो

शाहिरी कला जपण्याची गरज

शाहिरी पेशा गौरवाचा, प्रतिष्ठेचा आहे, सीमेवर जी भावना सैनिकांची असते तीच भावना शाहीर प्रबोधनातून मांडतात. सामाजिकता आहे म्हणून ते शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते, असा मानस रमेश कदम यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक क्षेत्रावर आक्रमण होत असून, शाहिरी ही कला जपण्याची गरज व्यक्त करून कदम यांनी लोकशाहीर निर्माण करण्यासाठी एक वेगळे व्यासपीठ निर्माण करावे लागेल, असेही ते म्हणाले.