शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

By admin | Updated: May 29, 2016 23:53 IST

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

सटाणा : गेल्या एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील अखेरचे पाणी आवर्तन रविवारी सकाळी दहा वाजता दोन्ही प्रकल्पामधून सोडल्यामुळे पाण्याअभावी ठप्प झालेल्या नदीकाठच्या तब्बल सव्वाशे पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन तब्बल वीस ते बावीस दिवस उशिरा सोडल्यामुळे मोसम व आरम नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन जलसंकट निर्माण झाले होते. त्यामुळे टॅँकर सुरू करा नाही तर पाण्याचे आवर्तन तरी सोडा, अशी ओरड सुरू झाली होती. जलसंपदा विभागाने शनिवारी सकाळी दहा वाजता हरणबारी धरणामधून ३४४ दशलक्ष घनफूट शिल्लक साठ्यापैकी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी चारशे क्युसेकने मोसम नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर केळझर धरणामधील शिल्लक असलेला ८६ दशलक्ष घनफूट संपूर्ण पाणीसाठा एकशे सत्तर क्युसेकने आरम नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे अखेरचे पाणी आवर्तन फक्त नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात आले असून, अखेरच्या गावापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी नदीकाठच्या खासगी पाणीपुरवठा विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्यात करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)