शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

By admin | Updated: May 29, 2016 23:53 IST

हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन

सटाणा : गेल्या एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील अखेरचे पाणी आवर्तन रविवारी सकाळी दहा वाजता दोन्ही प्रकल्पामधून सोडल्यामुळे पाण्याअभावी ठप्प झालेल्या नदीकाठच्या तब्बल सव्वाशे पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन तब्बल वीस ते बावीस दिवस उशिरा सोडल्यामुळे मोसम व आरम नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन जलसंकट निर्माण झाले होते. त्यामुळे टॅँकर सुरू करा नाही तर पाण्याचे आवर्तन तरी सोडा, अशी ओरड सुरू झाली होती. जलसंपदा विभागाने शनिवारी सकाळी दहा वाजता हरणबारी धरणामधून ३४४ दशलक्ष घनफूट शिल्लक साठ्यापैकी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी चारशे क्युसेकने मोसम नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर केळझर धरणामधील शिल्लक असलेला ८६ दशलक्ष घनफूट संपूर्ण पाणीसाठा एकशे सत्तर क्युसेकने आरम नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे अखेरचे पाणी आवर्तन फक्त नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात आले असून, अखेरच्या गावापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी नदीकाठच्या खासगी पाणीपुरवठा विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्यात करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)