शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन

 

सटाणा : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अखेर चणकापूर धरणातील अखेरचे आवर्तन सोडण्यात आल्याने आजपासून शहरास एक दिवसाआड पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पाच दिवसाआड झालेला पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. दरम्यान, वरुणराजाने आपली कृपादृष्टी न केल्यास शहरवासीयांना आगामी काळ कठीण ठरणार आहे.सटाणा शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर व केळझर धरणातील आवर्तनाबरोबरच जलसाठादेखील संपुष्टात आलेला आहे. परिणामी शहरात गेल्या दोन आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाच दिवसाआड शहरात पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांनी अत्यंत सोशिक पद्धतीने कुठलाही त्रागा न करता शांतपणे पाणीटंचाईला सामोरे जाणे पसंत केले. या उन्हाळ्यात सटाणा नगर परिषदेने शहरवासीयांना कमीत कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवू देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. यामुळे शहरवासीयांनीदेखील पालिका प्रशासनाला सहकार्याची भावना दाखविलेली आहे. मात्र सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर व चणकापूर धरणातील पिण्याचे पाण्याचे आवर्तन संपुष्टात आलेले आहे. दोघा धरणातील जलसाठादेखील संपलेला आहे. शहराला वेळप्रसंगी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे जलस्रोत आटलेले आहेत. यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे वरुणराजाने आपली कृपादृष्टी लवकर करावी, अन्यथा शहरवासीयांना पाण्यासाठी मोठ्या संकटाला सोमोर जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)