शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अनेक झाडं मोजताय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:01 IST

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.

ठळक मुद्दे ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झ

ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अधिक झाडांच्या केवळ काड्या उरल्या आहेत.रोपटं लहान असल्याने त्यास आधार म्हणून आजूबाजूस संरक्षण जाळ्या बसवल्या जातात,एकदा ते स्वत: उभे राहिले की त्या जाळ्या काढून ते मोठे होत जाते.परंतु इकडे तर सुरवातीच्या वेळीच अनेक झाडे कोलमांडून जात आहेत.येथे झाडांपेक्षा जाहिरातबाजी भर दिलेला दिसतो आहे.त्यामुळे आगामी काळात येथे सगळेच ओसाड झाले तर वावगे वाटू नये.पूर्वी महामार्ग एकेरी होता त्यामुळे आजूबाजूस शेकडो वर्षे जुनी झाडे होती.कालांतराने वाहन संख्या वाढल्याने दुपदरीचे रूपांतर सहापदरीत झाले.परिणामी सामाजिक बांधिलकी दाखवत एका राष्ट्रीयकृत खासगी बँकेने पुढाकार घेत हजारो रोपटं लावली.काही दिवस आजूबाजूस सर्वच हिरेगार होते.सध्या उन्हाळा तोंड वर काढत असताना सदरची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.आज अनेक सामाजिक स्तरावर वनराई वाढवण्यावर भर देत असताना महामार्गावरील झाडे अखेरच्या घटका मोजत आहे.याकडे संबंधित प्रशासनाने योग्य ते लक्ष घालण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींची नियमाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का हे देखील तपासून पाहणे तितकेच गरजेचे बनले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन मार्ग होण्यापूर्वी किती झाडं होती ती किती जुनी होती आण ित्या टक्त्यावर आज मितीस ग्रीन हायवेच्या नावाखाली किती जिवंत आहे याचा हिशोब झाला पाहिजे. जे लहान वृक्ष जगले ते आपले जे नाही त्यांचं नशीब खराब अशी मानिसकता नकोच.उन्हाळ्याच्या तोंडावर त्यांची निगा राखणे,त्यांना वेळोवेळी पाणी देणे,जेथे झाडं पूर्णपणे वाळून गेलेली आहे त्यांच्या जागी नवीन रोप लावावे अशी मागणी परिसरातील निसर्ग प्रेमींनी केली आहे.