शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

रेशनचे २० हजार क्विंटल धान्य व्यपगत

By admin | Updated: May 19, 2015 01:20 IST

रेशनचे २० हजार क्विंटल धान्य व्यपगत

  नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यामुळे जिल्'ात रेशनचे धान्य वाहतूक करण्याचा निर्माण झालेला पेच सुटत नसल्याने मे महिन्यासाठी मंजूर झालेल्या धान्यापैकी जवळपास वीस हजार क्विंटल धान्याची मुदतीत वाहतूक न होऊ शकल्याने सदरचे धान्य तूर्त व्यपगत झाले असून, त्याचा फटका ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. धान्य वाहतुकीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरटीओच्या मदतीने २७ मालट्रक सक्तीने ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्'ातील रेशन व्यवस्था धान्य वाहतूकदाराअभावी कोलमडून पडली असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी आजवर तीन वेळा धान्य वाहतुकीसाठी जाहीर निविदा मागविण्यात आल्या; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एकीकडे वाहतूकदाराची समस्या, तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना मुदतीत धान्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान पाहता, गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आपला विशेष अधिकार वापरून आरटीओच्या माध्यमातून काही खासगी वाहने अधिग्रहीत केले होते मात्र गुदामातून इच्छितस्थळी धान्य वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खासगी वाहतूकदारांनीही नकार दिला होता. त्यामुळे महिन्याकाठी ८० हजार क्विंटल धान्य वाहतूक करताना प्रशासनाची दमछाक होऊन त्यापैकी ६० टक्केधान्याची वाहतूक १५ मेपर्यंत होऊ शकली. परिणामी २० हजार क्विंटल धान्याची उचल न झाल्याने ते व्यपगत झाले, त्याचा थेट परिणाम शिधापत्रिकाधारकांवर होणार आहे. मात्र व्यपगत होऊ पाहणाऱ्या धान्याची उचल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.