शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्टÑवादीकडून ‘कंदील’ भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:38 IST

महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नाशिक : महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.विशेष म्हणजे, राष्टÑवादीचे आंदोलन सुरू असताना महावितरणचे कार्यालयच संपूर्ण काळोखात बुडालेले असल्यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले, तर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता पोलिसांनी कार्यालयाभोवती वेढा दिला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कंपनीने शहर व परिसरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असून, उद्योगधंद्यांना तेजीच्या काळात मंदीचा सामना करावा लागत आहे. आॅक्टोबर हीटमुळे अगोदरच नागरिक उष्णतेने घामाघूम झालेले असताना त्यात विजेच्या लपंडावाने आणखीनच भर पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.त्यानंतर शहर अभियंता तायडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यात पुरेशी वीज आहे त्यामुळे नाशिक शहरात भारनियमन होणार नाही असे महावितरणने जाहीर केलेले असतानाही विजेच्या तुटवड्याचे कारण दाखवून नाशिककरांना काळोखात लोटण्यात आले आहे. भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरू असून, अभ्यासासाठी कंदील व मेणबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शहरातील भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर चिटणीस संजय खैरनार, गौरव गोवर्धने, प्रशांत खरात, डॉ. अमोल वाजे, अ‍ॅड. सुरेश आव्हाड, डॉ. चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.