शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

राष्टÑवादीकडून ‘कंदील’ भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:38 IST

महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नाशिक : महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.विशेष म्हणजे, राष्टÑवादीचे आंदोलन सुरू असताना महावितरणचे कार्यालयच संपूर्ण काळोखात बुडालेले असल्यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले, तर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता पोलिसांनी कार्यालयाभोवती वेढा दिला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कंपनीने शहर व परिसरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असून, उद्योगधंद्यांना तेजीच्या काळात मंदीचा सामना करावा लागत आहे. आॅक्टोबर हीटमुळे अगोदरच नागरिक उष्णतेने घामाघूम झालेले असताना त्यात विजेच्या लपंडावाने आणखीनच भर पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.त्यानंतर शहर अभियंता तायडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यात पुरेशी वीज आहे त्यामुळे नाशिक शहरात भारनियमन होणार नाही असे महावितरणने जाहीर केलेले असतानाही विजेच्या तुटवड्याचे कारण दाखवून नाशिककरांना काळोखात लोटण्यात आले आहे. भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरू असून, अभ्यासासाठी कंदील व मेणबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शहरातील भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर चिटणीस संजय खैरनार, गौरव गोवर्धने, प्रशांत खरात, डॉ. अमोल वाजे, अ‍ॅड. सुरेश आव्हाड, डॉ. चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.