शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

बागलाणच्या जमिनी बेकायदेशीर शासनजमा

By admin | Updated: March 23, 2017 01:59 IST

नाशिक : मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी इनामाच्या जमिनी शासन जमा करताना केलेला आदेशच संदिग्ध असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून पवार यांचा आदेश रद्द ठरविला आहे.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील कथित जमीन घोटाळ्याचा आधार घेऊन महसूल विभागाला अडचणीत आणण्याची खेळी खेळू पाहणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्याच जमिनींसंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या एका निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी इनामाच्या जमिनी शासन जमा करताना केलेला आदेशच संदिग्ध असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून पवार यांचा आदेश रद्द ठरविला आहे. नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या  खरेदी-विक्री व्यवहाराला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कोट्यवधी रुपयांचा शासनाचा नजराणा बुडविल्याच्या कारणावरून नांदगावचे तत्कालीन तहसीलदार, प्रांत, मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह २२ व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. मुळात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची ही कारवाई महसूल कायद्यात हस्तक्षेप करणारी व बेकायदेशीर असल्याचे मत राजपत्रित महसूल अधिकारी महासंघाने व्यक्त करून या कारवाईविरोधात आंदोलनही केले होते. त्यामुळे चिडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महसूल खात्याच्या एकूणच जमीनविषयक प्रकरणे तपासून पाहण्याचा निर्णय घेऊन तशा कागदपत्रांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जानेवारी २०१५ रोजी काढलेल्या एका आदेशाची प्रत तसेच कळवण, बागलाण व सुरगाणा या तीन तालुक्यांतील जमीन व्यवहारांची लेखी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मागून महसूल विभागावर आपला दबाव वाढविला होता. ज्या बागलाणमधील जमिनींच्या व्यवहाराची माहिती घेऊन महसूल खात्याला अडचणीत आणण्याची खेळी लाचलुचपत विभागाने आखली होती, नेमकी तीच खेळी महसूल खात्याने उडवून लावली आहे. मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून जमीन शासनजमा केली होती. त्याच्या विरुद्ध जमीन मालक जगदीश दामोदर पाटील, दोधा राजाराम गोयकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले असता, त्यांचे अपील वैध ठरविण्यात आले. अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संदिग्ध असल्याचे नमूद करून जमीन शासनजमा करताना मालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही असे ताशेरेही ओढण्यात आले आहेत. त्यामुळे या जमिनींच्या व्यवहाराच्या आड महसूल अधिकाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळू पाहणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला चांगलीच चपराक बसली आहे. संशयिताना  निकालाचा लाभज्यांच्या जमिनी शासनजमा करण्यात आल्या, त्यांच्याकडून नजराणा रकमेची अनामत भरून घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पाहता, नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यात नजराणा रकमेचा अपहार वा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या संदर्भात दाखल केलेला गुन्हा फक्त याच एका आधारावर दाखल करून घेण्यात आला होता; मात्र पूर्णत: महसूल अधिनियमान्वये होणाऱ्या जमिनींच्या व्यवहारात अनेक तरतुदी असून, त्याचा कोणताही विचार न करता हा गुन्हा दाखल झाल्याने आता संशयिताना नेमका त्याचाच लाभ खटल्यात मिळेल, पर्यायाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे हसे होण्याची शक्यता आहे.