शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी दिल्या, कालवा झाला...पाणी मोबदला मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:39 IST

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या तक्रारी : सुळे उजव्या कालव्याच्या कामाचा आराखडा करुन त्रुटी दूर करणार

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशान्वये आमदार नितीन पवार यांच्या समवेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए जीं मोरे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कायर्कारी अभियंता तुषार पाटील यांनी कालव्याची पहाणी करुन २१ किमीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची पहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.सुळे उजव्या कालव्याच्या निविदेत असलेली व प्रत्यक्षात झालेली कामे यांचा आराखडा करुन पाणी पोहोचण्यास येणाºया अडचणी दूर करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे यावेळी यंत्रणेने सांगितले.कालव्यातील त्रुटी दूर करा, सिद्धेश्वर बंधाºयांची उंची वाढवा पण पाटविहीर पर्यंत पाणी पोहोचवा अशी सूचना आमदार पवार यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला केली. कालव्याचे कामे पूर्ण झाले मात्र योग्य केली नसल्यामुळे व पाणी वाहण्यासाठी योग्य चढ उतार नसल्याने कमी दाबाने पाणी येते त्यामुळे शेवटपर्यंत पोहचत नसल्याचे यावेळी निदशर्नास आले. पाणी सोडल्यानंतर कालव्यात लोखंडी पाईप टाकलेल्या ठिकठिकाणी व सिमेंटच्या नित्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे पाणी झिरपते, पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते, पाणी कमी दाबाने जात असल्यामुळे पुढे पोहोचत नाही अशा गंभीर तक्रारी शेतकºयांनी केल्या.सिद्धेश्वर,पिंपळा, मोहबारी, ईंशी, धार्डेदिगर, पाडगण,नाळीद, भांडणे, रवळजी, देसराणे येथील शेतकºयांच्या तक्रारी जाणून घेत नितीन पवार व यंत्रणेने कालव्याची ठिकठिकाणी पाहणी केली. यावेळी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, नारायण हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, संदीप वाघ, शिवाजी चौरे, बबन वाघ, मुन्ना वाघ, बाळासाहेब शेवाळे, विनोद भालेराव आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतagricultureशेती