शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जमिनी दिल्या, कालवा झाला...पाणी मोबदला मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:39 IST

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या तक्रारी : सुळे उजव्या कालव्याच्या कामाचा आराखडा करुन त्रुटी दूर करणार

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशान्वये आमदार नितीन पवार यांच्या समवेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए जीं मोरे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कायर्कारी अभियंता तुषार पाटील यांनी कालव्याची पहाणी करुन २१ किमीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची पहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.सुळे उजव्या कालव्याच्या निविदेत असलेली व प्रत्यक्षात झालेली कामे यांचा आराखडा करुन पाणी पोहोचण्यास येणाºया अडचणी दूर करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे यावेळी यंत्रणेने सांगितले.कालव्यातील त्रुटी दूर करा, सिद्धेश्वर बंधाºयांची उंची वाढवा पण पाटविहीर पर्यंत पाणी पोहोचवा अशी सूचना आमदार पवार यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला केली. कालव्याचे कामे पूर्ण झाले मात्र योग्य केली नसल्यामुळे व पाणी वाहण्यासाठी योग्य चढ उतार नसल्याने कमी दाबाने पाणी येते त्यामुळे शेवटपर्यंत पोहचत नसल्याचे यावेळी निदशर्नास आले. पाणी सोडल्यानंतर कालव्यात लोखंडी पाईप टाकलेल्या ठिकठिकाणी व सिमेंटच्या नित्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे पाणी झिरपते, पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते, पाणी कमी दाबाने जात असल्यामुळे पुढे पोहोचत नाही अशा गंभीर तक्रारी शेतकºयांनी केल्या.सिद्धेश्वर,पिंपळा, मोहबारी, ईंशी, धार्डेदिगर, पाडगण,नाळीद, भांडणे, रवळजी, देसराणे येथील शेतकºयांच्या तक्रारी जाणून घेत नितीन पवार व यंत्रणेने कालव्याची ठिकठिकाणी पाहणी केली. यावेळी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, नारायण हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, संदीप वाघ, शिवाजी चौरे, बबन वाघ, मुन्ना वाघ, बाळासाहेब शेवाळे, विनोद भालेराव आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतagricultureशेती