शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

जमिनी दिल्या, कालवा झाला...पाणी मोबदला मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:39 IST

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या तक्रारी : सुळे उजव्या कालव्याच्या कामाचा आराखडा करुन त्रुटी दूर करणार

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशान्वये आमदार नितीन पवार यांच्या समवेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए जीं मोरे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कायर्कारी अभियंता तुषार पाटील यांनी कालव्याची पहाणी करुन २१ किमीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची पहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.सुळे उजव्या कालव्याच्या निविदेत असलेली व प्रत्यक्षात झालेली कामे यांचा आराखडा करुन पाणी पोहोचण्यास येणाºया अडचणी दूर करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे यावेळी यंत्रणेने सांगितले.कालव्यातील त्रुटी दूर करा, सिद्धेश्वर बंधाºयांची उंची वाढवा पण पाटविहीर पर्यंत पाणी पोहोचवा अशी सूचना आमदार पवार यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला केली. कालव्याचे कामे पूर्ण झाले मात्र योग्य केली नसल्यामुळे व पाणी वाहण्यासाठी योग्य चढ उतार नसल्याने कमी दाबाने पाणी येते त्यामुळे शेवटपर्यंत पोहचत नसल्याचे यावेळी निदशर्नास आले. पाणी सोडल्यानंतर कालव्यात लोखंडी पाईप टाकलेल्या ठिकठिकाणी व सिमेंटच्या नित्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे पाणी झिरपते, पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते, पाणी कमी दाबाने जात असल्यामुळे पुढे पोहोचत नाही अशा गंभीर तक्रारी शेतकºयांनी केल्या.सिद्धेश्वर,पिंपळा, मोहबारी, ईंशी, धार्डेदिगर, पाडगण,नाळीद, भांडणे, रवळजी, देसराणे येथील शेतकºयांच्या तक्रारी जाणून घेत नितीन पवार व यंत्रणेने कालव्याची ठिकठिकाणी पाहणी केली. यावेळी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, नारायण हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, संदीप वाघ, शिवाजी चौरे, बबन वाघ, मुन्ना वाघ, बाळासाहेब शेवाळे, विनोद भालेराव आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतagricultureशेती