नाशिकरोड : मुंबईहून रत्नागिरी-वाराणसी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशाची रोकड व सोन्याचे दागिने असा पावणेतीन लाखांचा ऐवज असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी-वाराणसी एक्स्प्रेस मुंबई मार्गे जाते. उत्तर प्रदेश येथील संजय हरिदास शुक्ला हे सहकुटुंब इलाहाबादला जाण्यासाठी मुंबईहून बसले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानक येण्यास काही मिनिटे बाकी असताना प्रवासी संजय शुक्ला यांना जाग आली. मात्र दरम्यानच्या काळात बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्या बॅगमध्ये ८५ हजार रुपये रोख, १ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार, झुमके, चैन, अंगठी, पायातले जोडवे, दहा हजार रुपये किमतीची साडी असा एकूण २ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. याबाबत इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पावणेतीन लाखांचा ऐवज एक्स्प्रेसमधून लंपास
By admin | Updated: August 25, 2015 23:50 IST