शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लाखो मराठा नाशिकहून मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:12 IST

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे.

नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी नाशिकमधून लाखो मराठा मोर्चेकरी मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईकडे रवाना झाले असून, हा ओघ बुधवारी (दि.९) सकाळी मोर्चा सुरू होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून, मुंबईकडे जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.आझाद मैदानात धडकणाºया या मोर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचे समन्वयक समितीने स्पष्ट केले असून, नियोजन समिती पथकांसह समन्वय समितीचे कार्यकर्तेही मंगळवारी सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहे. वीर जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात होऊन आझाद मैदानापर्यंत पोहोचणाºया मोर्चात सर्व मोर्चेकरी सहभागी होणार असून, मुंबईत क्रांतिदिनी निघणारा मराठा क्रांती मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’, असा निघणार असल्याचा दावा नाशिकच्या समन्वय समितीने केला आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाही राज्यभरात झालेल्या ५७ मूक मोर्चांप्रमाणेच मूक स्वरूपाचा असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. मराठा क्रांती मोर्चा बुधवारी सकाळी ११ वाजता वीर जिजामाता उद्यानापासून सुरू होईल. हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात पोहोचणार आहे. याठिकाणी समाजातील काही निवडक कन्या मोर्चाला संबोधित करणार आहे. यात राज्यभारतील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून समाजाची भूमिका मांडणाºया समाजकन्यांचा समावेश असणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एका समाजकन्येची निवड करण्यात आली असून, केवळ नाशिकमधून दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. या समाजकन्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आझाद मैदानावरील व्यासपीठावरून कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार आहेत. तसेच मराठा समाजाची भूमिकाही मांडणार आहेत.