शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मातोरीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडपला

By admin | Updated: March 25, 2015 23:59 IST

ग्रामस्थांचे धरणे : सेना-भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : तालुक्यातील मातोरी येथील शेतकऱ्यांची बनावट दस्तावेजाद्वारे कोट्यवधी रुपयांची जमीन काही राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिकांनी हडपल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.मातोरी येथील दीडशे शेतकऱ्यांच्या हक्काची सुमारे २०४ एकर शेतजमीन चुकीच्या व्यक्तीच्या नावाने खोटे कागदपत्र दाखवून संबंधितांनी ताब्यात घेतली. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर २ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु शिवसेना आणि भाजपाचे काही विद्यमान पदाधिकारी आणि माजी खासदार, त्यांचे कुटुुंबीय यांचा त्यात समावेश असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे १३ मार्च रोजी सरकारवाडा पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली. परंतु त्यांनीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून, राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असल्यानेच या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आणि जमीन परत मिळावी यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात पंडित कातड पाटील, दिलीप कातड, भिका कातड, प्रभाकर धोंडगे, बाजीराव पिंगळे, रामदास पिंगळे, आनंदा जाधव, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)