शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाळेअभावी चारशे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:14 IST

नाशिक : आदिवासी व निराधार असलेल्या इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षण व आरोग्याची काळजी घेणारे कस्तुरबा गांधी ...

नाशिक : आदिवासी व निराधार असलेल्या इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षण व आरोग्याची काळजी घेणारे कस्तुरबा गांधी विद्यालय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वयात येऊ पाहणाऱ्या या विद्यार्थिनींना दरमहा शाळांमधून सॅनिटरी नॅपकिन पुरवून त्यांच्या लैंगिक आरोग्याची काळजी घेतली जात होती. तथापि, गेल्या आठ महिन्यांपासून या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची कोणतीही सोय उपलब्ध होऊ न शकल्याने शिक्षण विभाग चिंतित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या निराधार, विधवा, परितक्त्या मातांच्या मुलींना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची संकल्पना राबविली जात आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी विद्यालये सुरू करण्यात आली असून, या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व निवासाची सोय आहे. त्यांच्या निर्वाहासाठी दरमहा दीड हजार रुपये भत्ताही दिला जातो. साधारणत: वयाच्या बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थिनी या शाळांमध्ये विद्यार्जन करतात, मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील चारही विद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थिनी पुन्हा आपल्या घराकडे परतल्या आहेत. शाळेत असताना या विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षण व त्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच दरमहा सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यात येत होते. आता मात्र या विद्यार्थिनी शाळेपासून दुरावल्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नाबरोबरच आरोग्याचीही काळजी शिक्षण विभागाला वाटू लागली आहे. मुळात या विद्यार्थिनी आदिवासी व दुर्गम अशा वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आहेत, शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असून, गावात औषधी दुकाने अथवा सॅनिटरी नॅपकिन मिळण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या लैंगिक आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विखुरलेल्या ठिकाणी त्या राहत असल्याने त्यांच्यापर्यंत ही साधने कशी व कोण पोहोचविणार, असाही प्रश्न असून, त्याचा खर्च उचलण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येतात काय, याची चाचपणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.