शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

शाळेअभावी चारशे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:14 IST

नाशिक : आदिवासी व निराधार असलेल्या इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षण व आरोग्याची काळजी घेणारे कस्तुरबा गांधी ...

नाशिक : आदिवासी व निराधार असलेल्या इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षण व आरोग्याची काळजी घेणारे कस्तुरबा गांधी विद्यालय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वयात येऊ पाहणाऱ्या या विद्यार्थिनींना दरमहा शाळांमधून सॅनिटरी नॅपकिन पुरवून त्यांच्या लैंगिक आरोग्याची काळजी घेतली जात होती. तथापि, गेल्या आठ महिन्यांपासून या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची कोणतीही सोय उपलब्ध होऊ न शकल्याने शिक्षण विभाग चिंतित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या निराधार, विधवा, परितक्त्या मातांच्या मुलींना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची संकल्पना राबविली जात आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी विद्यालये सुरू करण्यात आली असून, या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व निवासाची सोय आहे. त्यांच्या निर्वाहासाठी दरमहा दीड हजार रुपये भत्ताही दिला जातो. साधारणत: वयाच्या बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थिनी या शाळांमध्ये विद्यार्जन करतात, मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील चारही विद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थिनी पुन्हा आपल्या घराकडे परतल्या आहेत. शाळेत असताना या विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षण व त्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच दरमहा सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यात येत होते. आता मात्र या विद्यार्थिनी शाळेपासून दुरावल्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नाबरोबरच आरोग्याचीही काळजी शिक्षण विभागाला वाटू लागली आहे. मुळात या विद्यार्थिनी आदिवासी व दुर्गम अशा वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आहेत, शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असून, गावात औषधी दुकाने अथवा सॅनिटरी नॅपकिन मिळण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या लैंगिक आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विखुरलेल्या ठिकाणी त्या राहत असल्याने त्यांच्यापर्यंत ही साधने कशी व कोण पोहोचविणार, असाही प्रश्न असून, त्याचा खर्च उचलण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येतात काय, याची चाचपणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.