शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST

मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहेविस्तारीकरण झाल्यानंतर घोटीजवळ पथकर नाकामुंबई आणि नाशिकला जाणाºया प्रवाशांचे अतोनात हाल

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.नाशिक आणि मुंबईकडे जाणाºया वाहनधारकांना तासन्तास वाहनांच्या रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे चालकांनी संताप व्यक्त केला असून, याबाबत महामार्ग प्राधिकरणाने दखल घेऊन वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गाचे पडघे ते गोंदे दरम्यान विस्तारीकरण झाल्यानंतर घोटीजवळ पथकर नाका सुरू करण्यात आला आहे. आठ लेन असलेल्या या नाक्यावर आरंभीच्या काळात सुलभतेने टोल आकारणी करून कमी वेळेत आणि सोयीस्करपणे वाहने जात येत होती. मात्र अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने व कर्मचारी संथपणे कामे करीत असल्याने टोलनाक्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. सुटीच्या दिवशी वाहनांची संख्या मोठी असल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, नेहमीच होणाºया या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, मुंबई आणि नाशिकला जाणाºया प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून नाशिक-मुंबई प्रवास सुखकर करावा, अशी मागणी चालक व प्रवाशांकडून होत आहे