शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हाल : विहिरींची पाणीपातळी खालावली सावकारवाडीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला.

ठळक मुद्देसावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेतकूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न

सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे परिसरातील तपमानात वाढ झाली आहे. सावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेत. दररोज या परिसरातून हजारो लिटर दूध डेअरींना पाठवले जाते. त्यामुळे दर दहा दिवसांनी या भागात लाखो रुपयांचे चलन फिरते. याशिवाय हा भाग कांद्याचे आगार समजला जातो. पाणीटंचाईचे सावट असल्यामुळे दुभत्या जनावरांचा वैरणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेल्या दोन पैशातून विहिरीत आडव्या कूपनलिका, नवीन विहिरी, उभ्या कूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आडात नाही तर पोहºयात कुठून येणार? विहिरी खोदण्यासाठी परप्रांतीय लोक आले आहेत. चार ते पाच हजार रु पये फूट या दराने खोदकाम चालू आहे. आडव्या कूपनलिका पन्नास रु पये, तर उभ्या कूपनलिकेचा दर साठ रुपये आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र, राजस्थान या राज्यांतील लोकांना सुगीचे दिवस आले आहेत. एवढे प्रयत्न करूनही पाणी मात्र लागत नाही. त्यामुळे मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा वाया जात नाही. तात्पुरता उपाय म्हणून गिरणा डॅम परिसरातून ओला चारा मागवत आहेत. पण तोही किती पुरणार? जून महिन्यापर्यंत जनावरे जगवायची आहेत. त्यामुळे मोठे आव्हान शेतकºयांपुढे उभे आहे. मातीमोल भावात जनावरे विकावी लागत आहेत. कोट्यवधी रुपयांचे पशुधन वाचवायचे असेल तर आत्तापासून काही उपाययोजना केल्या पाहिजेत. मुळातच हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. पाऊस पडावा म्हणून या परिसरात असलेल्या हजारो हेक्टर परिघाच्या पठारावर वनखात्याने वृक्षलागवड केली पाहिजे. समतल चर, वनतळे, नालाबांध आदी कामे हाती घेतली पाहिजेत. यामुळे पाणी जमिनीत मुरून पाणलोट क्षेत्र वाढेल. या भागात मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या आहे, लांडगे व कधी बिबट्यांचे दर्शन घडते, त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. झाडी धरणात चणकापूर कालव्याद्वारे पाणी टाकणे प्रस्ताावित आहे. पाच-सहा कि.मी. कालव्याचे काम बाकी आहे, ते येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.