शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

शेतकऱ्यांचे हाल : विहिरींची पाणीपातळी खालावली सावकारवाडीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला.

ठळक मुद्देसावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेतकूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न

सावकारवाडी : परिसरातील जळगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, मांजरे परिसरात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरींनी तळ गाठला असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे परिसरातील तपमानात वाढ झाली आहे. सावकारवाडी व झाडी गावातच हजारो दुभत्या गायी आहेत. दररोज या परिसरातून हजारो लिटर दूध डेअरींना पाठवले जाते. त्यामुळे दर दहा दिवसांनी या भागात लाखो रुपयांचे चलन फिरते. याशिवाय हा भाग कांद्याचे आगार समजला जातो. पाणीटंचाईचे सावट असल्यामुळे दुभत्या जनावरांचा वैरणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेल्या दोन पैशातून विहिरीत आडव्या कूपनलिका, नवीन विहिरी, उभ्या कूपनलिका खोदून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आडात नाही तर पोहºयात कुठून येणार? विहिरी खोदण्यासाठी परप्रांतीय लोक आले आहेत. चार ते पाच हजार रु पये फूट या दराने खोदकाम चालू आहे. आडव्या कूपनलिका पन्नास रु पये, तर उभ्या कूपनलिकेचा दर साठ रुपये आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र, राजस्थान या राज्यांतील लोकांना सुगीचे दिवस आले आहेत. एवढे प्रयत्न करूनही पाणी मात्र लागत नाही. त्यामुळे मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा वाया जात नाही. तात्पुरता उपाय म्हणून गिरणा डॅम परिसरातून ओला चारा मागवत आहेत. पण तोही किती पुरणार? जून महिन्यापर्यंत जनावरे जगवायची आहेत. त्यामुळे मोठे आव्हान शेतकºयांपुढे उभे आहे. मातीमोल भावात जनावरे विकावी लागत आहेत. कोट्यवधी रुपयांचे पशुधन वाचवायचे असेल तर आत्तापासून काही उपाययोजना केल्या पाहिजेत. मुळातच हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. पाऊस पडावा म्हणून या परिसरात असलेल्या हजारो हेक्टर परिघाच्या पठारावर वनखात्याने वृक्षलागवड केली पाहिजे. समतल चर, वनतळे, नालाबांध आदी कामे हाती घेतली पाहिजेत. यामुळे पाणी जमिनीत मुरून पाणलोट क्षेत्र वाढेल. या भागात मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या आहे, लांडगे व कधी बिबट्यांचे दर्शन घडते, त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. झाडी धरणात चणकापूर कालव्याद्वारे पाणी टाकणे प्रस्ताावित आहे. पाच-सहा कि.मी. कालव्याचे काम बाकी आहे, ते येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.