शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

मालेगावी चर्च परिसरात नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:17 IST

या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या ...

या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या भागात गटारी नसल्याने पावसाचे पाणी व इतर सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही तसेच घाण पाणी घरांमध्ये शिरते व सखल भागात साचून राहते. परिणामी डास निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. याठिकाणी अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे न केल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच या भागात झाडू कामगार, घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे घाण, कचरा साचून राहतो. महापालिकेने याविषयी गंभीर दखल घेऊन वेळोवेळी औषध फवारणी करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर विशेष निधीतून भूमिगत गटारी निर्माण कराव्यात अन्यथा या भागातील रहिवासी महानगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा कर भरणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी परिसरातील रहिवासी शैला अहिरे, शोभना बच्छाव, इंदुमती पाटील,ज्योती अहिरे, रेखा कोठावदे, शोभा पाचपुते, आशाबाई भामरे, मनोहर देशमुख, सचिन वाघ, संजय पाचपुते, नानाजी अहिरे, विश्वनाथ घोरपडे, तुळशीदास देशमुख, गोपाळराव देवरे, राजेंद्र कोठावदे आदी उपस्थित होते.