शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:33 IST

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसललेविद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. कंत्राटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन कायदेशीर असल्याचे आणि कुणीही कायदा हातात घेतला नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना कारवाई थांबवावी लागली. असे असले तरी शुक्रवारी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी याप्रकरणी चर्चा होणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. गेल्या एक तारखेपासून आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी रोजगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी उपोेषणकर्त्यांची भेट घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाºयांप्रकरणी तोडगा निघेल असे वाटत असतानाच कुलसचिव, प्रशासन अधिकारी आणि विधी अधिकाºयांनी परस्पर जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. विद्यापीठाने अचानक भूमिका बदलल्याने कंत्राटी कर्मचारी संभ्रमात असून, विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त करीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्र्धार केला. मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, पोलिसांचा फौजफाटा तसेच अतिक्रमण विभागाच्या वाहनासह आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आंदोलन बंद करावे, असे उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी कॉम्रेड श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. भूषण साबळे यांनी पोलिसांना आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे सांगत आंदोलनाचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याने पोलीस नरमले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी कॉमे्रड श्रीधर देशपांडे यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी याप्रकरणी चर्चा करून निर्णय घेण्याचा तोडगा काढला.देशपांडे यांच्या गाडीला अपघातआंदोलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाट्यासह आल्याचे समजताच कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे महात्मानगर येथून आंदोलनाच्या ठिकाणी येत असताना कुलकर्णी गार्डनजवळ त्यांची गाडी दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. त्यांना किरकोळ इजा झाली. यावेळी त्यांनी उपचार न करता गाडी तेथेच सोडून उपोषण स्थळ गाठण्यास प्राधान्य दिले.