शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:33 IST

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसललेविद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. कंत्राटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन कायदेशीर असल्याचे आणि कुणीही कायदा हातात घेतला नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना कारवाई थांबवावी लागली. असे असले तरी शुक्रवारी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी याप्रकरणी चर्चा होणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. गेल्या एक तारखेपासून आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी रोजगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलले आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी उपोेषणकर्त्यांची भेट घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाºयांप्रकरणी तोडगा निघेल असे वाटत असतानाच कुलसचिव, प्रशासन अधिकारी आणि विधी अधिकाºयांनी परस्पर जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. विद्यापीठाने अचानक भूमिका बदलल्याने कंत्राटी कर्मचारी संभ्रमात असून, विद्यापीठ कंत्राटी कर्मचाºयांबाबत असंवेदनशील असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त करीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्र्धार केला. मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, पोलिसांचा फौजफाटा तसेच अतिक्रमण विभागाच्या वाहनासह आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आंदोलन बंद करावे, असे उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी कॉम्रेड श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. भूषण साबळे यांनी पोलिसांना आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे सांगत आंदोलनाचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याने पोलीस नरमले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी कॉमे्रड श्रीधर देशपांडे यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी याप्रकरणी चर्चा करून निर्णय घेण्याचा तोडगा काढला.देशपांडे यांच्या गाडीला अपघातआंदोलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाट्यासह आल्याचे समजताच कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे महात्मानगर येथून आंदोलनाच्या ठिकाणी येत असताना कुलकर्णी गार्डनजवळ त्यांची गाडी दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. त्यांना किरकोळ इजा झाली. यावेळी त्यांनी उपचार न करता गाडी तेथेच सोडून उपोषण स्थळ गाठण्यास प्राधान्य दिले.