शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 22:13 IST

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अशी मागणी करत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडून होत असलेल्या दडपशाहीचा निषेधही केला.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : परप्रांतीय ट्रक ड्रायव्हर, आॅपरेटर, कामगार घरी परतण्यासाठी अस्वस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अशी मागणी करत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडून होत असलेल्या दडपशाहीचा निषेधही केला.समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वावी येथे साडेपाचशे लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी असणाºया ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांच्याकडून व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देतात. खाण्यापिण्याच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला नेहमीच वावी गावात जावे लागते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने गावातील जाणेही समृद्धी महामार्ग : परप्रांतीय ट्रक ड्रायव्हर, आॅपरेटर, कामगार घरी परतण्यासाठी अस्वस्थ मजुरांचे कामबंद आंदोलनधोक्याचे ठरते. शिवाय संचारबंदी आदेशाचा भंग केला म्हणून वारंवार पोलीस ठाण्यातही जावे लागते. असे असताना कंपनी प्रशासन मात्र सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्रास देत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. आम्हाला घराची ओढ लागली आहे.कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याने साहजिकच आमचे कुटुंबीयदेखील काळजीत आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने आमचे पगार व थकीत देऊन आमची गावाकडे परत जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. कंपनीकडून अशी व्यवस्था होत नसेल तर प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष घालावे व आम्हाला सुखरूप गावाकडे पोहोचवावे, अशी मागणी करत सकाळपासूनच कॅम्पसच्या आवारात हे कामगार एकत्र येऊन व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणा देत होते. त्यामुळे वावी कॅम्पसमधून आज एकही वाहन बाहेर पडले नसल्याचे या कामगारांनी सांगितले. आमच्या अडचणींची सोडवणूक होत नाही तोपर्यंत कंपनी विरोधात असहकार पुकारण्यात येईल अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

नियम न मोडण्याचे आवाहन

कामगारांकडून सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार संदीप शिंदे यांनी कॅम्पसमध्ये धाव घेतली. कर्मचाºयांनी कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या शासनाच्या आदेशाचे पालन करावे. कुठल्याही परिस्थितीत एकत्र येऊन नियम मोडू नये असे आवाहन ढाकणे यांनी केले.

कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येणार

कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सहायक निरीक्षक रणजित गलांडे यांच्यामार्फत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल. कामगारांची मागणी योग्य असली तरी कायदेशीर सोपस्कार पार पाडूनच कामगारांची गावाकडे जाण्याची व्यवस्था करता येईल. याकडे लक्ष वेधत कुणीही कामगाराने नियम मोडू नये असे आवाहन ढाकणे यांनी केले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करणार नाही असा पवित्रा घेत कंपनी व्यवस्थापनाच्या मुस्कटदाबीला आता आम्ही बळी पडणार नाही असे या कामगारांनी सांगितले.

 

 

टॅग्स :StrikeसंपSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग