शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

लासलगावी कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:42 IST

राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे

ठळक मुद्देशेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहेगोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लासलगाव (नाशिक), दि. 30 -  राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे. तसेच गोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल. जिल्ह्यातील येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रेल्वेचे देशातील पहिल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ओनियन कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  हस्ते तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह मंत्री महोदयांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.

 सभेत गोंधळाचा प्रयत्न  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कृषी कर्जमाफीबद्दल येवला येथील संतू पाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पाच- दहा मिनिटे सभेत गोंधळ सुरू झाला. त्यावेळी फडणवीस यांनी भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत आपल्या कार्यक्रमाचे वेळी मीडियाने लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर यावी म्हणून असा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. लोकांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे आणि टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे म्हणताच उपस्थित हजारो महिला पुरुषांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवित साथ दिली. या वेळी शेतकरी घोषणाबाजी होत असताना जोरदार आवेशात भाषण करीत या घोषणा बाजीराव चोख प्रत्युत्तर देत आपल्या कुशल भाषण सामर्थ्याची चुणूक दाखवित सेवा अवघ्या पाच मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले.