शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:42 IST

राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे

ठळक मुद्देशेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहेगोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लासलगाव (नाशिक), दि. 30 -  राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे. तसेच गोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल. जिल्ह्यातील येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रेल्वेचे देशातील पहिल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ओनियन कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  हस्ते तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह मंत्री महोदयांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.

 सभेत गोंधळाचा प्रयत्न  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कृषी कर्जमाफीबद्दल येवला येथील संतू पाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पाच- दहा मिनिटे सभेत गोंधळ सुरू झाला. त्यावेळी फडणवीस यांनी भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत आपल्या कार्यक्रमाचे वेळी मीडियाने लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर यावी म्हणून असा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. लोकांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे आणि टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे म्हणताच उपस्थित हजारो महिला पुरुषांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवित साथ दिली. या वेळी शेतकरी घोषणाबाजी होत असताना जोरदार आवेशात भाषण करीत या घोषणा बाजीराव चोख प्रत्युत्तर देत आपल्या कुशल भाषण सामर्थ्याची चुणूक दाखवित सेवा अवघ्या पाच मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले.