शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:47 IST

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.

ठळक मुद्देकांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.सदरचा निपाह हा रोग केरळच्या ठरावीक जिल्ह्यात व विशिष्ट भाजीपाला व फळांवर आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या मातीत पिकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. असे निर्यातदार संघटनेच्या वतीने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर खासदार राजू शेट्टीव सदाभाऊ खोत यांनी थेट दिल्ली स्थित केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून त्यावर तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले.निपाह हा व्हायरस वाटवाघळामुळे फळांवर आणि फळातून माणसात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजीपाला आणि फळांवर कुवेतने बंदी घातली आहे. याचा निर्यातीवर परिणाम होत असून शासनाने निपाहच्या प्रतिबंधाबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. शेतमालाची निर्यात बंद झाली तर शेती व शेतकरी अडचणीत येतील असेही बोलले जात आहे.केरळच्या ठरावीक जागी सिमित असणाºया निपाह विषाणूच्या भीतीने कुवेतने कांदा व भाजीपाल्याची कोंडी केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतप्रमाणे अन्य देशदेखील भारताच्या भाजीपाला, कांदा यावर बंदी घालू शकतील. केंद्र व राज्य शासनाने याबाबत गंभीर होऊन परिस्थिती हाताळावी.- नंदकुमार आट्टल,कांदा व्यापारी, येवला बंदीच्या संकटामुळे निर्यातदार धास्तावले असून, कांद्याचे भावदेखील एका कंटेनरला लाख रु पयांनी कमी झाले आहेत. कुवेतची निर्यात चालू असताना कांद्याला ८०० ते १००० रु पयापर्यंत भाव होते. हा माल आता अन्य देशात वळवावा लागत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.- संतोष आट्टल, राज्य निर्यातदार संघटना प्रतिनिधी, येवला