शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:47 IST

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.

ठळक मुद्देकांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.सदरचा निपाह हा रोग केरळच्या ठरावीक जिल्ह्यात व विशिष्ट भाजीपाला व फळांवर आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या मातीत पिकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. असे निर्यातदार संघटनेच्या वतीने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर खासदार राजू शेट्टीव सदाभाऊ खोत यांनी थेट दिल्ली स्थित केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून त्यावर तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले.निपाह हा व्हायरस वाटवाघळामुळे फळांवर आणि फळातून माणसात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजीपाला आणि फळांवर कुवेतने बंदी घातली आहे. याचा निर्यातीवर परिणाम होत असून शासनाने निपाहच्या प्रतिबंधाबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. शेतमालाची निर्यात बंद झाली तर शेती व शेतकरी अडचणीत येतील असेही बोलले जात आहे.केरळच्या ठरावीक जागी सिमित असणाºया निपाह विषाणूच्या भीतीने कुवेतने कांदा व भाजीपाल्याची कोंडी केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतप्रमाणे अन्य देशदेखील भारताच्या भाजीपाला, कांदा यावर बंदी घालू शकतील. केंद्र व राज्य शासनाने याबाबत गंभीर होऊन परिस्थिती हाताळावी.- नंदकुमार आट्टल,कांदा व्यापारी, येवला बंदीच्या संकटामुळे निर्यातदार धास्तावले असून, कांद्याचे भावदेखील एका कंटेनरला लाख रु पयांनी कमी झाले आहेत. कुवेतची निर्यात चालू असताना कांद्याला ८०० ते १००० रु पयापर्यंत भाव होते. हा माल आता अन्य देशात वळवावा लागत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.- संतोष आट्टल, राज्य निर्यातदार संघटना प्रतिनिधी, येवला