शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

‘कुंभासाठी व्हावे प्राधिकरण’

By admin | Updated: September 23, 2015 22:38 IST

शंकराचार्य अधोक्षजानंद : पंतप्रधानांची भेट घेऊन करणार चर्चा

पंचवटी : दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, तसेच त्रुटी राहू नये यासाठी केंद्र शासनाने महाकुंभासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाची स्थापना करावी जेणेकरून चारही कुंभमेळ्यात योग्य नियोजन करता येईल याचा विचार करावा, असे शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राष्ट्रीय प्राधिकरण स्थापना करण्याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दिल्लीत संवाद साधण्यासाठी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकचा सिंहस्थ शांततेत पार पडला; मात्र केंद्र शासनाने कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही ही लांच्छनास्पद बाब आहे. हजारो भाविक सिंहस्थात येतात, त्यातून केंद्र शासनाला पैसा मिळतो. इतरत्र केंद्र शासन सिंहस्थ कुंभमेळ्याला निधी देत असते.कुंभमेळ्यात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय प्राधिकरण केल्यास सुधारणा होईल व प्रशासनाची दमछाक होणार नाही. राष्ट्रीय प्राधिकरणाचे कार्यालय मुंबईत सुरू करावे व तेथून चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन करावे. या प्राधिकरण समितीत आखाडे, तसेच धर्माचार्यांच्या माध्यमातून सदस्य नियुक्ती करावेत. यात शासकीय प्रतिनिधी, वृत्तपत्र प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)