शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

‘क्रांतिसूर्य’ने उघडला कालिदासचा पडदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा ...

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन भव्य बाईक रॅली काढून सावित्रीबाईंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेली समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना किती अडचणींवर कशी मात करावी लागली, या विषयावरील नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात आले. या नाट्य सादरीकरणापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. त्यात नाशिकच्या विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, समीना मेमन, आशा कटारे, वैशाली नाईकवाडे, अनघा धोडपकर, विजय राऊत, बाजीराव तिडके, सी. एम. सैनी, नीलेश खैरे, कल्पना कुटे, अनंता सूर्यवंशी, राजेश शर्मा, संतोष कमोद, शशी हिरवे, उत्तम आंबे, संजय गिते, चंद्रकांत बागूल आणि सूत्रधार योगेश कमोद आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्यामुळेच आम्ही सर्व महिला शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचू शकलो, असे सांगितले. तर डाॅ. बच्छाव यांनी फुले दाम्पत्याने अनंत यातना सोसूनही महिलांना शिक्षणाचे व्दार खुले केल्याने संपूर्ण समाज आणि महिलांवर त्यांचे खूप मोठे ऋण असल्याचे सांगितले.

राजेश शर्मा लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात नाशिकच्या ४० कलावंतांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून योगेश कमोद यांनी कामकाज पाहिले.

फोटो

८५

क्रांतिसूर्य नाटकातील एका प्रसंगात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले.

९६

‘मी सावित्री’चे फलक हाती घेऊन महिलांनी काढलेली बाईक रॅली.