शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कोळगावमाळ तलावाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:43 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला. तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.

ठळक मुद्देदुुरुस्तीचे काम युध्दपातळीवर : मुंगेर लागून भगदाड पडल्याने लाखों लिटर पाणी वाया

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला.तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, वावी, कहांडळवाडी, सायळे, दुशिंगपूर, मिठसागरे, शहा, मिरगाव या गावांना गोदावरी उजवा कालव्यालगत पाथरे बुद्रुक शिवारात बांधण्यात आलेल्या तलावातून ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या कोळगावमाळ येथील तलावाच्या आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे वाढल्याने भरावाला भगदाड पडते. आता पर्यंत तीन ते चार वेळेस भगदाड पडून पाणी वाया गेले आहे. यावेळी दहा ते बारा लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजू बाजूच्या शेतकऱ्यांना या वाया जाणाºया पाण्यामुळे त्रास होत आहे. त्यांची पीके अतिरिक्त पाण्यामुळे जळून जात आहे. परिसरातील शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. ऊस, मका, डाळिंब, सोयाबीन, कांदा, घास आदी पिकांना अतिरिक्त पाणी मिळाले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. अनेक दिवस शेतात ओलावा राहत असल्याने शेतात कामे देखील करता येत नाही.पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किरण घेगडमल, सदस्य सोमनाथ घोलप, गोरक्षनाथ पडवळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, पाथरे बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, बाबासाहेब सोमवंशी, सुरेश नरोडे, सुनिल नरोडे, बाबासाहेब वाणी, सतिष जोर्वेकर, सुखदेव थोरात, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोविंद मोरे यांना तळ्याला मुंगेर पडल्याचे कळल्यावर त्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव घालून पाणी गळती रोखण्यात आली. तळ्याच्या आतील बाजूस साधारण पाच ते सहा ट्रॅक्टर मातीचा भराव टाकण्यात आला. तळ्यात जादा पाणी साठा, झाडे झुडपांमुळे मुंगेर पडले असल्याचे समजते. तळ्याच्या आजू बाजूला असणारी काटेरी झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष घेगडमल यांनी सांगितले.गळतीमुळे तळ्यातील पाणी कमी तर होतेच परंतु आजू बाजूच्या शेतकºयांना त्याचा त्रास व आर्थिक हानी सोसावी लागते. कायमस्वरूपी यावर उपाय योजना करण्यांत यावी तसेच अशी मागणी होत आहे.