शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कोळगावमाळ तलावाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:43 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला. तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.

ठळक मुद्देदुुरुस्तीचे काम युध्दपातळीवर : मुंगेर लागून भगदाड पडल्याने लाखों लिटर पाणी वाया

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला.तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, वावी, कहांडळवाडी, सायळे, दुशिंगपूर, मिठसागरे, शहा, मिरगाव या गावांना गोदावरी उजवा कालव्यालगत पाथरे बुद्रुक शिवारात बांधण्यात आलेल्या तलावातून ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या कोळगावमाळ येथील तलावाच्या आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे वाढल्याने भरावाला भगदाड पडते. आता पर्यंत तीन ते चार वेळेस भगदाड पडून पाणी वाया गेले आहे. यावेळी दहा ते बारा लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजू बाजूच्या शेतकऱ्यांना या वाया जाणाºया पाण्यामुळे त्रास होत आहे. त्यांची पीके अतिरिक्त पाण्यामुळे जळून जात आहे. परिसरातील शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. ऊस, मका, डाळिंब, सोयाबीन, कांदा, घास आदी पिकांना अतिरिक्त पाणी मिळाले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. अनेक दिवस शेतात ओलावा राहत असल्याने शेतात कामे देखील करता येत नाही.पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किरण घेगडमल, सदस्य सोमनाथ घोलप, गोरक्षनाथ पडवळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, पाथरे बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, बाबासाहेब सोमवंशी, सुरेश नरोडे, सुनिल नरोडे, बाबासाहेब वाणी, सतिष जोर्वेकर, सुखदेव थोरात, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोविंद मोरे यांना तळ्याला मुंगेर पडल्याचे कळल्यावर त्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव घालून पाणी गळती रोखण्यात आली. तळ्याच्या आतील बाजूस साधारण पाच ते सहा ट्रॅक्टर मातीचा भराव टाकण्यात आला. तळ्यात जादा पाणी साठा, झाडे झुडपांमुळे मुंगेर पडले असल्याचे समजते. तळ्याच्या आजू बाजूला असणारी काटेरी झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष घेगडमल यांनी सांगितले.गळतीमुळे तळ्यातील पाणी कमी तर होतेच परंतु आजू बाजूच्या शेतकºयांना त्याचा त्रास व आर्थिक हानी सोसावी लागते. कायमस्वरूपी यावर उपाय योजना करण्यांत यावी तसेच अशी मागणी होत आहे.