शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कोळगावमाळ तलावाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:43 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला. तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.

ठळक मुद्देदुुरुस्तीचे काम युध्दपातळीवर : मुंगेर लागून भगदाड पडल्याने लाखों लिटर पाणी वाया

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला.तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, वावी, कहांडळवाडी, सायळे, दुशिंगपूर, मिठसागरे, शहा, मिरगाव या गावांना गोदावरी उजवा कालव्यालगत पाथरे बुद्रुक शिवारात बांधण्यात आलेल्या तलावातून ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या कोळगावमाळ येथील तलावाच्या आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे वाढल्याने भरावाला भगदाड पडते. आता पर्यंत तीन ते चार वेळेस भगदाड पडून पाणी वाया गेले आहे. यावेळी दहा ते बारा लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजू बाजूच्या शेतकऱ्यांना या वाया जाणाºया पाण्यामुळे त्रास होत आहे. त्यांची पीके अतिरिक्त पाण्यामुळे जळून जात आहे. परिसरातील शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. ऊस, मका, डाळिंब, सोयाबीन, कांदा, घास आदी पिकांना अतिरिक्त पाणी मिळाले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. अनेक दिवस शेतात ओलावा राहत असल्याने शेतात कामे देखील करता येत नाही.पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किरण घेगडमल, सदस्य सोमनाथ घोलप, गोरक्षनाथ पडवळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, पाथरे बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, बाबासाहेब सोमवंशी, सुरेश नरोडे, सुनिल नरोडे, बाबासाहेब वाणी, सतिष जोर्वेकर, सुखदेव थोरात, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोविंद मोरे यांना तळ्याला मुंगेर पडल्याचे कळल्यावर त्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव घालून पाणी गळती रोखण्यात आली. तळ्याच्या आतील बाजूस साधारण पाच ते सहा ट्रॅक्टर मातीचा भराव टाकण्यात आला. तळ्यात जादा पाणी साठा, झाडे झुडपांमुळे मुंगेर पडले असल्याचे समजते. तळ्याच्या आजू बाजूला असणारी काटेरी झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष घेगडमल यांनी सांगितले.गळतीमुळे तळ्यातील पाणी कमी तर होतेच परंतु आजू बाजूच्या शेतकºयांना त्याचा त्रास व आर्थिक हानी सोसावी लागते. कायमस्वरूपी यावर उपाय योजना करण्यांत यावी तसेच अशी मागणी होत आहे.