शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

ज्ञान हेच संस्कृतीचे अधिष्ठान

By admin | Updated: January 31, 2015 00:46 IST

विजय भटकर : मुक्त विद्यापीठाच्या २१व्या पदवीदान समारंभप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारतीय संस्कृती प्राचीन असून, दरवेळी ती नव्याने प्रकट होत असते. ज्ञान हेच या संस्कृतीचे अधिष्ठान असल्याने पुढील पिढीसाठी या संस्कृतीचे संवर्धन करणे आपण सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात झालेल्या २१व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भटकर बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश महाजन, कुलसचिव प्रकाश अतकरे आणि विविध विद्याशाखांचे संचालक व्यासपीठावर होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात ४० हून अधिक विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. भारतीय संस्कृती ही अलौकिक पुरातन आणि तितकीच सनातन आहे. असे असूनही तिचे महत्त्व आजही अबाधित आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तक्षशीला व नालंदा विद्यापीठ या प्राचीन विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. देशामध्ये सातशेहून अधिक विद्यापीठे आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यापीठांना ‘डिजिटल युनिर्व्हर्सिटी’ म्हणून जेव्हढे काम करता आले नाही तेव्हढी प्रगती मुक्त विद्यापीठाने केली असल्याचे गौरवोद्गार भटकर यांनी काढले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आजवरच्या सर्व कुलगुरुंचे प्रयत्न मोलाचे ठरले आहे. प्रथम कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी या क्षेत्रात केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांचे योगदान विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले. विद्यापीठाचा कार्यविस्तार आणि अभ्यासक्रमांची व्याप्ती पाहता विद्यापीठ हे जगातील मेगा युनिर्व्हर्सिटी म्हणून नावारूपास येईल यासाठी विद्यापीठाचे काम आणि कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रयत्न पथदर्शी ठरतील, असे डॉ. भटकर म्हणाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह कुलगुरू, विद्याशाखांचे संचालक दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाकडून १२४ अभ्यासक्रम शिकविले जातात त्यामधून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने उद्योग-शिक्षण असे धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमाची निर्मिती केली असल्याचे सांगितले. विद्यापीठातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असून, अनेक संस्थांच्या मदतीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न सोडविला असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी मानव्यविद्याशाखा, वाणिज्य विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, कृषी विज्ञान विद्याशाखा, निरंतर विद्याशाखा, आरोग्य विद्याशाखा, शैक्षणिक सेवा विभाग आणि संगणक विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ. मो. स. गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. २७ हजार १९० पदविका, ९८ हजार ४२६ पदवी, ६ हजार ६९१ पदव्युत्तर पदवी आणि २० विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)