शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभा : मंत्रालयाकडे प्रयाण; विविध मागण्यांसाठी १२ रोजी विधिमंडळाला घेराव घालणार ऊनझळा सोसत ‘लॉँग मार्च’ची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:34 IST

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

ठळक मुद्देमोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ऊनझळा सोसत निघालेल्या या मोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती. १२ मार्चला हा मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाप्रसंगी दिली़राज्य किसान सभेच्या वतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकºयांच्या लॉँग मार्चला मंगळवार, दि़ ६ मार्चपासून प्रारंभ झाला. २००८ मध्ये तयार करण्यात आलल्या वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विना अट सर्व शेतकºयांना कर्जमुक्ती द्यावी, वीजबिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार-पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदींसह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेच्या वतीने हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात महाराष्टÑासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा येथील शेतकरी सहभागी झाले असून, प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत. मोर्चाचे नियोजन मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी सहभागी शेतकºयांच्या जिल्हा व तालुकानिहाय २५० ते ३०० ग्रामसमित्या करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून घेतलेल्या शिध्याच्या साहाय्याने भोजनव्यवस्था सांभाळली जात आहे. गटनिहाय नाश्ता, जेवणाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जात आहे. मोर्चेकरांसाठी पाण्याचे ५० टॅँकर तसेच महाराष्ट्र सीटू मेडिकल संघटनेमार्फत आरोग्यसुविधा पुरविली जात आहे. स्वच्छतागृहाची सुविधा मुक्कामस्थळी सोयीप्रमाणे केली जात आहे.मोर्चेकºयांची दैनंदिनीरोज पहाटे ५ वाजता मोर्चेकºयांना उठविले जाते. ६ वाजेपर्यंत नाश्ता करून ६.३० वाजता पुढील मार्गक्रमणास सुरुवात होते. दुपारी १२ वाजता नियोजित ठिकाणी भोजन झाल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होतो. रात्री मुक्कामस्थळी महामार्गालगतच निवासाची व्यवस्था केली जाते. मोर्चेकरी रोज ३० किलोमीटर प्रवास करतात. दिमतीला पाणी तसेच आरोग्यसुविधाही असते. या मोर्चात महिलांसह तरुण व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे.