शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

किसान सभा : मंत्रालयाकडे प्रयाण; विविध मागण्यांसाठी १२ रोजी विधिमंडळाला घेराव घालणार ऊनझळा सोसत ‘लॉँग मार्च’ची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:34 IST

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

ठळक मुद्देमोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ऊनझळा सोसत निघालेल्या या मोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती. १२ मार्चला हा मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाप्रसंगी दिली़राज्य किसान सभेच्या वतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकºयांच्या लॉँग मार्चला मंगळवार, दि़ ६ मार्चपासून प्रारंभ झाला. २००८ मध्ये तयार करण्यात आलल्या वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विना अट सर्व शेतकºयांना कर्जमुक्ती द्यावी, वीजबिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार-पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदींसह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेच्या वतीने हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात महाराष्टÑासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा येथील शेतकरी सहभागी झाले असून, प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत. मोर्चाचे नियोजन मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी सहभागी शेतकºयांच्या जिल्हा व तालुकानिहाय २५० ते ३०० ग्रामसमित्या करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून घेतलेल्या शिध्याच्या साहाय्याने भोजनव्यवस्था सांभाळली जात आहे. गटनिहाय नाश्ता, जेवणाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जात आहे. मोर्चेकरांसाठी पाण्याचे ५० टॅँकर तसेच महाराष्ट्र सीटू मेडिकल संघटनेमार्फत आरोग्यसुविधा पुरविली जात आहे. स्वच्छतागृहाची सुविधा मुक्कामस्थळी सोयीप्रमाणे केली जात आहे.मोर्चेकºयांची दैनंदिनीरोज पहाटे ५ वाजता मोर्चेकºयांना उठविले जाते. ६ वाजेपर्यंत नाश्ता करून ६.३० वाजता पुढील मार्गक्रमणास सुरुवात होते. दुपारी १२ वाजता नियोजित ठिकाणी भोजन झाल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होतो. रात्री मुक्कामस्थळी महामार्गालगतच निवासाची व्यवस्था केली जाते. मोर्चेकरी रोज ३० किलोमीटर प्रवास करतात. दिमतीला पाणी तसेच आरोग्यसुविधाही असते. या मोर्चात महिलांसह तरुण व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे.