शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

किसान सभा : मंत्रालयाकडे प्रयाण; विविध मागण्यांसाठी १२ रोजी विधिमंडळाला घेराव घालणार ऊनझळा सोसत ‘लॉँग मार्च’ची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:34 IST

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

ठळक मुद्देमोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ऊनझळा सोसत निघालेल्या या मोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती. १२ मार्चला हा मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाप्रसंगी दिली़राज्य किसान सभेच्या वतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकºयांच्या लॉँग मार्चला मंगळवार, दि़ ६ मार्चपासून प्रारंभ झाला. २००८ मध्ये तयार करण्यात आलल्या वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विना अट सर्व शेतकºयांना कर्जमुक्ती द्यावी, वीजबिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार-पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदींसह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेच्या वतीने हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात महाराष्टÑासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा येथील शेतकरी सहभागी झाले असून, प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत. मोर्चाचे नियोजन मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी सहभागी शेतकºयांच्या जिल्हा व तालुकानिहाय २५० ते ३०० ग्रामसमित्या करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून घेतलेल्या शिध्याच्या साहाय्याने भोजनव्यवस्था सांभाळली जात आहे. गटनिहाय नाश्ता, जेवणाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जात आहे. मोर्चेकरांसाठी पाण्याचे ५० टॅँकर तसेच महाराष्ट्र सीटू मेडिकल संघटनेमार्फत आरोग्यसुविधा पुरविली जात आहे. स्वच्छतागृहाची सुविधा मुक्कामस्थळी सोयीप्रमाणे केली जात आहे.मोर्चेकºयांची दैनंदिनीरोज पहाटे ५ वाजता मोर्चेकºयांना उठविले जाते. ६ वाजेपर्यंत नाश्ता करून ६.३० वाजता पुढील मार्गक्रमणास सुरुवात होते. दुपारी १२ वाजता नियोजित ठिकाणी भोजन झाल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होतो. रात्री मुक्कामस्थळी महामार्गालगतच निवासाची व्यवस्था केली जाते. मोर्चेकरी रोज ३० किलोमीटर प्रवास करतात. दिमतीला पाणी तसेच आरोग्यसुविधाही असते. या मोर्चात महिलांसह तरुण व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे.