शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला पडला महागात

By admin | Updated: February 22, 2016 23:37 IST

दुष्काळात तेरावा : उत्पन्न वाढण्याऐवजी ढोबळी मिरचीच्या पिकाची झाली फुलगळ

शैलेश कर्पे सिन्नरशेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारच्या कृषी विभागाच्या परवानगीने चालविल्या जाणाऱ्या ‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला घेणे अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला भलतेच महागात पडले. या किसान कॉल सेंटरने पाठविलेल्या ‘एसएमएस’च्या आधारे ढोबळी मिरचीच्या पिकावर औषधाची फवारणी केल्यानंतर सर्वच्या सर्व फुले गळून जाण्यासह पीकही सुकून गेले. यामुळे कारवाडी येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील कारवाडी येथील दगेश पोपट बहिरट या युवा शेतकऱ्याने अस्मानी व सुलतानी या सर्व संकटांचा सामना करीत आपल्या तीन हजार चौस मीटर क्षेत्रावर नेटशेडमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात अस्मानी संकटे यापूर्वी आली आहेत. याचा विचार करून अवकाळी पाऊस किंवा गारपीट यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी त्याने शेडनेटसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दुष्काळात ठिबकच्या साहाय्याने दगेश बहिरट या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीची लागवड केली.आधुनिक शेतीची कास घेतलेल्या बहिरट यांच्या मेहनत व कष्टाच्या जोरावर ढोबळी मिरचीचे पीक चांगले जोमात आले होते. पहिल्या तोड्यात बहिरट यांनी १३० जाळी ढोबळी मिरचीचे उत्पन्न मिळाले. मात्र किरकोळ प्रमाणात फुलगळ होत असल्याने ती रोखण्यासाठी व आणखी चांगले उत्पन्न मिळावे यासाठी बहिरट यांनी इफको किसान संचार लिमिटेडच्या पुणे येथील १८००१८०१५५१ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सल्ला विचारला होता. यानंतर दुसऱ्याच मिनिटाला या किसान कॉल सेंटरकडून बहिरट यांना एसएमएस आला. त्यावर प्लनोफिक्स ५ मिली व ६० ग्रॅम ००:५२:३४ हे १५ लिटर पाण्यात एकत्र करून ते फवारण्याचा सल्ला देण्यात आला होता. बहिरट यांनी त्याप्रमाणे फवारणी केली.फवारणी केल्यानंतर अर्धा तासाच्या आत ढोबळी मिरचीच्या सर्व फुलांची गळ होऊन पीक सुकण्यास प्रारंभ झाला. बहिरट यांना पहिल्या तोडीपासून १३० जाळी उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या तोडीच्या आत सर्व फुलगळ झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार बहिरट यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत कॉल सेंटरकडे फोनवरून तक्रार केल्यानंतर पहाणीसाठी येणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. सिन्नरचा पूर्वभाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करून व किसान कॉल सेंटरची मदत घेऊन उभ्या केलेल्या पिकाचे उत्पन्न वाढण्यापेक्षा चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)