शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला पडला महागात

By admin | Updated: February 22, 2016 23:37 IST

दुष्काळात तेरावा : उत्पन्न वाढण्याऐवजी ढोबळी मिरचीच्या पिकाची झाली फुलगळ

शैलेश कर्पे सिन्नरशेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारच्या कृषी विभागाच्या परवानगीने चालविल्या जाणाऱ्या ‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला घेणे अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला भलतेच महागात पडले. या किसान कॉल सेंटरने पाठविलेल्या ‘एसएमएस’च्या आधारे ढोबळी मिरचीच्या पिकावर औषधाची फवारणी केल्यानंतर सर्वच्या सर्व फुले गळून जाण्यासह पीकही सुकून गेले. यामुळे कारवाडी येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील कारवाडी येथील दगेश पोपट बहिरट या युवा शेतकऱ्याने अस्मानी व सुलतानी या सर्व संकटांचा सामना करीत आपल्या तीन हजार चौस मीटर क्षेत्रावर नेटशेडमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात अस्मानी संकटे यापूर्वी आली आहेत. याचा विचार करून अवकाळी पाऊस किंवा गारपीट यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी त्याने शेडनेटसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दुष्काळात ठिबकच्या साहाय्याने दगेश बहिरट या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीची लागवड केली.आधुनिक शेतीची कास घेतलेल्या बहिरट यांच्या मेहनत व कष्टाच्या जोरावर ढोबळी मिरचीचे पीक चांगले जोमात आले होते. पहिल्या तोड्यात बहिरट यांनी १३० जाळी ढोबळी मिरचीचे उत्पन्न मिळाले. मात्र किरकोळ प्रमाणात फुलगळ होत असल्याने ती रोखण्यासाठी व आणखी चांगले उत्पन्न मिळावे यासाठी बहिरट यांनी इफको किसान संचार लिमिटेडच्या पुणे येथील १८००१८०१५५१ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सल्ला विचारला होता. यानंतर दुसऱ्याच मिनिटाला या किसान कॉल सेंटरकडून बहिरट यांना एसएमएस आला. त्यावर प्लनोफिक्स ५ मिली व ६० ग्रॅम ००:५२:३४ हे १५ लिटर पाण्यात एकत्र करून ते फवारण्याचा सल्ला देण्यात आला होता. बहिरट यांनी त्याप्रमाणे फवारणी केली.फवारणी केल्यानंतर अर्धा तासाच्या आत ढोबळी मिरचीच्या सर्व फुलांची गळ होऊन पीक सुकण्यास प्रारंभ झाला. बहिरट यांना पहिल्या तोडीपासून १३० जाळी उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या तोडीच्या आत सर्व फुलगळ झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार बहिरट यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत कॉल सेंटरकडे फोनवरून तक्रार केल्यानंतर पहाणीसाठी येणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. सिन्नरचा पूर्वभाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करून व किसान कॉल सेंटरची मदत घेऊन उभ्या केलेल्या पिकाचे उत्पन्न वाढण्यापेक्षा चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)