शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

पावसाअभावी खरीप हंगाम लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:32 IST

खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

ठळक मुद्देमृग नक्षत्र कोरडे : आर्द्रा नक्षत्राच्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा

खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.बियाणे, खते औषधे विक्र ेत्यांकडे देखील शांतता आहे. त्यामुळे बळीराजासह व्यापारी, शेतमजूर, नोकरदारवर्ग यांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरीप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनाकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली ती अद्यापर्यंत कायम आहे. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु आर्द्रा नक्षत्राचेही पहिले दोन तीन दिवस कोरडेठाक गेले.आकाशात ढग दाटून येतात तोच वादळी वारा सुटून ढग कुठच्या कुठे वाहून जातात. परिणामी बळीराजाच्या आशेची निराशा होते. यावर्षी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी बळीराजाने शेतीची नांगरणी करून ठेवली आहे. परिणामी पाऊस पडल्यानंतर पेरणी पूर्व मशागत करून बियाणे पेरता येतील या आशेवर शेतकरी एक एक दिवस ढकलत आहेत. त्यातच दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत.साहजिकच विहिरींनीही हिवाळ्यात तळ गाठला. खरिपाचा हंगाम हा पावसावरच अवलंबून असल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागून आहेत. खरिपाची पूर्वतयारी कशी करायचीकाही वर्षांपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा. त्यामुळे मे महिन्यात तपमानही कमी असायचे. वळीव बरसला की शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी करता यायची त्यामुळे मुगाच्या पावसावर पेरण्याही उरकल्या जायच्या. मात्र काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. वळीव न बसल्यामुळे खरिपाची पूर्वतयारी कशी करायची, या चिंतेत शेतकरी पडला आहे. त्यामुळे आता सगळा हवाला मान्सूनवरच आहे. याबाबत काहीच सांगता येत नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.