शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पावसाअभावी खरीप हंगाम लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:32 IST

खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

ठळक मुद्देमृग नक्षत्र कोरडे : आर्द्रा नक्षत्राच्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा

खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.बियाणे, खते औषधे विक्र ेत्यांकडे देखील शांतता आहे. त्यामुळे बळीराजासह व्यापारी, शेतमजूर, नोकरदारवर्ग यांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरीप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनाकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली ती अद्यापर्यंत कायम आहे. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु आर्द्रा नक्षत्राचेही पहिले दोन तीन दिवस कोरडेठाक गेले.आकाशात ढग दाटून येतात तोच वादळी वारा सुटून ढग कुठच्या कुठे वाहून जातात. परिणामी बळीराजाच्या आशेची निराशा होते. यावर्षी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी बळीराजाने शेतीची नांगरणी करून ठेवली आहे. परिणामी पाऊस पडल्यानंतर पेरणी पूर्व मशागत करून बियाणे पेरता येतील या आशेवर शेतकरी एक एक दिवस ढकलत आहेत. त्यातच दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत.साहजिकच विहिरींनीही हिवाळ्यात तळ गाठला. खरिपाचा हंगाम हा पावसावरच अवलंबून असल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागून आहेत. खरिपाची पूर्वतयारी कशी करायचीकाही वर्षांपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा. त्यामुळे मे महिन्यात तपमानही कमी असायचे. वळीव बरसला की शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी करता यायची त्यामुळे मुगाच्या पावसावर पेरण्याही उरकल्या जायच्या. मात्र काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. वळीव न बसल्यामुळे खरिपाची पूर्वतयारी कशी करायची, या चिंतेत शेतकरी पडला आहे. त्यामुळे आता सगळा हवाला मान्सूनवरच आहे. याबाबत काहीच सांगता येत नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.