शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खरीप भरपाई अनुदानापासून वंचित

By admin | Updated: September 8, 2016 00:37 IST

निवेदन : आराईच्या शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

सटाणा : तालुक्यातील आराई येथील शेकडो शेतकरी खरीप अनुदानापासून वंचित आहेत. वंचित शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान अदा करून दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१५ च्या खरिपासाठी अनुदान जाहीर केले होते. बागलाण तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला होता. तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना महसूल विभागाने तत्काळ अनुदान अदा करून द्यावे या मागणीसाठी शेतकरी राजेंद्र बारकू रौंदळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार सौंदाणे यांनी शासनाच्या भरपाई अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊनच याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य परशुराम अहिरे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, आराईचे माजी सरपंच माधव अहिरे, समीर पाटील, चिंधा पाटील, नीलेश अहिरे, विलास अहिरे, नितीन सोनवणे, हेमंत निकम, मनोज सोनवणे, देवा अहिरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)