शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खानगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:22 IST

खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देडांबरीकरण करण्याची मागणी : दहा वर्षांपासून रस्त्यावर खड्डे

निफाड : खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याबाबत मागणी होत असताना कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. खानगाव थडी ते ब्राह्मणवाडे यादरम्यान तारू खेडले, तामसवाडी, करंजी ही गावे येतात. या नऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेही वाहनधारकांना कळेनासे झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. शिवाय या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून, वाहन चालविणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. विशेष म्हणजे तारू खेडले ते ब्राह्मणवाडे या दरम्यानच्या रस्त्यावर जवळजवळ चाळीस ते पन्नास ठिकाणी नाल्या पडलेल्या आहे. या नाल्यातून वाहन जाताना वाहने आपटल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड होऊन बसले आहे. या खड्ड्यामुळे वाहनांची सुद्धा वाट लागली असून, वाहने वारंवार दुरुस्त करावी लागतात. थोडक्यात सदरचे खड्डे आणि नाले पार करताना डोंगरदऱ्यातील दुर्गम भागातून जातो की काय अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. ब्राह्मणवाडे करंजी, तामसवाडी, तारू खेडले येथील शेतकऱ्यांना नागरिकांना सायखेडा आणि निफाड येथे विविध कामांसाठी जावे लागते, परंतु या खड्ड्यांमुळे येण्या जाण्यातच भरपूर वेळ या नागरिकांचा जात असतो आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावरून सायखेडा, निफाड, पिंपळगावबसवंत, विंचूर मार्केटसाठी शेतकरी कांद्याचे ट्रॅक्टर नेत असतात. परंतु प्रचंड खड्ड्यांमुळे हे कांद्याचे ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होते. त्यामुळे मार्केटला पोहोचण्यास उशीर होत असतो.तारू खेडले तामसवाडी करंजी, ब्राह्मणवाडे, हा परिसर बिबट्याप्रवण नसल्याने रात्रीच्या अंधारात हळुवारपणे वाहने चालविताना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. या रस्त्याची दहा वर्षांत साधी डागडुजी सुद्धा झाली नाही. त्यामुळे गोदाकाठच्या या नागरिकांनी या रस्त्याबाबत प्रचंड हाल सोसले त्यामुळे २० वर्षांपासून या भागातील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. या रस्त्याची अशी दुरवस्था गेल्या दहा वर्षांपासून आहे. आता तरी या रस्त्याचे डांबरीकरण करून आमच्यावरचा वनवास व अन्याय थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तामसवाडी ते करंजी यादरम्यान कासारी नाला असून,पावसाळ्यात या नाल्यात पाणी साचल्याने असल्याने ब्राह्मणवाडे, करंजी या गावातील नागरिकांना सायखेडा, निफाडकडे येणे मुश्किल होते. मागील वर्षी या नाल्यात पाणी साचल्याने वाहतूक बंद झाल्याने करंजी येथून मांजरगाव शाळेसाठी येणाºया विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे आम्ही दुर्गम भागात राहतो की काय असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. या नाल्यावर छोटा पूल बांधावा, अशी या नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा