शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सातारे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:54 IST

मानोरी : येवला तालुक्यातील सातारे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाची बारागाड्या ओढून उत्साहात सांगता करण्यात आली.

यंदाच्या वर्षी या यात्रेला सोळा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गावातून अश्वासोबत काठी मिरवणूक काढण्यात आली. खंडेराव महाराज भक्तांनी भंडारा उधळीत व वाद्याच्या तालावर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर करीत भर उन्हात ठेका धरला होता. खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त गावात सात दिवस जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागरण गोंधळात खंडेराव भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावर्षी बारागाड्या ओढण्याचा मान रमेश पठारे यांना मिळाला होता. सात दिवस रोज रात्री ९ ते २ या वेळेत अनेक वाघे मंडळींनी या जागरण गोंधळासाठी हजेरी लावली होती. पठारे यांनी बारागाड्या ओढल्यानंतर रात्रभर रहाडी जागरण करण्यात आले. त्यानंतर लंगर तोडून उत्सवाची सांगता झाली. यात्रोत्सवात दत्तात्रय दखने, ज्ञानेश्वर गचाले, अनिल पानसरे, कृष्णा गांगुर्डे, शरद मखरे, जालिंदर साठे, गणपत शेळके, सुरेश झाल्टे, गणेश पतंगराव, तुकाराम गवारे, गोकुळ साठे, रमेश पठारे, रामदास सोमवंशी, अनिल मखरे, राजेंद्र मखरे, दिपक मखरे आदींसह गावकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्रा