शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

खैराई-वाघेरा किल्ला पर्यटन विकासापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:23 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर :पर्यटकांना भुरळ:लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.वाघेरा किल्ला हा त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळ १६ किलो मिटर अंतरावर आहे तर खैराई किल्ला हा त्र्यंबकेश्वर पासून ४५ किलो मिटर अंतरावर आहे. हिरवीगर्द झाडी, व आजूबाजूला घनदाट झाडी वेली फुलांनी घाट माथाच्या नाल्यामधून खळखळणारे झरे, आल्हाददायक वातावरण व किल्याच्या पायथ्याशी असलेली कारवी कुडानी सजलेली ही खेडी पर्यटकाना भूरळ घालतात. किल्यावर्ती अनेक ठिकाणी पाणवठे असून आज त्यांची अतिशय दयनीय परिस्तिथी आहे. या ठिकाणी जुन्या तोफा दोन असून त्यातील एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी पर्यटक यांची गर्दी होत असते. येथील धबधबे आण िखोल खोल ढोह हे एक आकर्षणाचा भाग आहे.मागील वर्षी हरसूल व ठाण पाडा येथील तरु णांनी किल्ल्यावर्ती वृक्षारोपण व पाणवठे यांची साप सपाई केली होती. आज या किल्ल्याची ढासळला ढसाळ होत असून या इतिहास कालीन किल्याचे संवर्धन जपावे यासाठी येथील परिसरातील युवकांनी तसेच ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन, आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देऊन पर्यटन विकास निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा तसेच खैराई हे दोन्ही किल्ले तालुक्याच्या शान वाढवत आहे. खैराई किल्ला महाराष्ट्र व गुजरात सीमे लगत असून येथील सृष्टी सौंदर्य व किर्र झाडी यामुळे पर्यटक आकर्षित होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटावर माणसासारखे प्रेम केले, त्याच्या स्मृती जपण्याची ही वेळ आहे, यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे.- मिथुन राऊत, शिवप्रेमी व गडकोट प्रेमी.

टॅग्स :Governmentसरकारtourismपर्यटन