शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खैराई-वाघेरा किल्ला पर्यटन विकासापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:23 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर :पर्यटकांना भुरळ:लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.वाघेरा किल्ला हा त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळ १६ किलो मिटर अंतरावर आहे तर खैराई किल्ला हा त्र्यंबकेश्वर पासून ४५ किलो मिटर अंतरावर आहे. हिरवीगर्द झाडी, व आजूबाजूला घनदाट झाडी वेली फुलांनी घाट माथाच्या नाल्यामधून खळखळणारे झरे, आल्हाददायक वातावरण व किल्याच्या पायथ्याशी असलेली कारवी कुडानी सजलेली ही खेडी पर्यटकाना भूरळ घालतात. किल्यावर्ती अनेक ठिकाणी पाणवठे असून आज त्यांची अतिशय दयनीय परिस्तिथी आहे. या ठिकाणी जुन्या तोफा दोन असून त्यातील एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी पर्यटक यांची गर्दी होत असते. येथील धबधबे आण िखोल खोल ढोह हे एक आकर्षणाचा भाग आहे.मागील वर्षी हरसूल व ठाण पाडा येथील तरु णांनी किल्ल्यावर्ती वृक्षारोपण व पाणवठे यांची साप सपाई केली होती. आज या किल्ल्याची ढासळला ढसाळ होत असून या इतिहास कालीन किल्याचे संवर्धन जपावे यासाठी येथील परिसरातील युवकांनी तसेच ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन, आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देऊन पर्यटन विकास निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी केली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा तसेच खैराई हे दोन्ही किल्ले तालुक्याच्या शान वाढवत आहे. खैराई किल्ला महाराष्ट्र व गुजरात सीमे लगत असून येथील सृष्टी सौंदर्य व किर्र झाडी यामुळे पर्यटक आकर्षित होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटावर माणसासारखे प्रेम केले, त्याच्या स्मृती जपण्याची ही वेळ आहे, यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे.- मिथुन राऊत, शिवप्रेमी व गडकोट प्रेमी.

टॅग्स :Governmentसरकारtourismपर्यटन