शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:45 IST

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .

ठळक मुद्देखामखेडा : शेतकरी चिंतातुर; दुबार पेरणी ओढावण्याची भिती

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .कारण पिकाची उगवण झाल्यानंतर थोडेसे पीक मोठी झाल्यावर पिकाचे मुळ खोलवर अठरा इंच पर्यत जातात. परंतु या अल्पशा पाऊसाने जमिनीचा ओलावा सह इंच होता. त्यावर शेतकºयाने पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकºयाने महागडी बियाणे घेऊन पिकाची पेरणी केली आहे.काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. पिके थोडी मोठी झाल्याने त्याची पाण्याची भूक वाढली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून, पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जूलै महिन्याच्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी होत आला आहे. परंतु या पंधरा दिवसामघ्ये एकदाही दमदार पाऊस झाला नाही.पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप निट पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात शेवटी झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे.पाऊस नाही व उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशी भिती आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे.