शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:45 IST

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .

ठळक मुद्देखामखेडा : शेतकरी चिंतातुर; दुबार पेरणी ओढावण्याची भिती

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .कारण पिकाची उगवण झाल्यानंतर थोडेसे पीक मोठी झाल्यावर पिकाचे मुळ खोलवर अठरा इंच पर्यत जातात. परंतु या अल्पशा पाऊसाने जमिनीचा ओलावा सह इंच होता. त्यावर शेतकºयाने पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकºयाने महागडी बियाणे घेऊन पिकाची पेरणी केली आहे.काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. पिके थोडी मोठी झाल्याने त्याची पाण्याची भूक वाढली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून, पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जूलै महिन्याच्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी होत आला आहे. परंतु या पंधरा दिवसामघ्ये एकदाही दमदार पाऊस झाला नाही.पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप निट पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात शेवटी झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे.पाऊस नाही व उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशी भिती आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे.