शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

केळझरचे पाणी पेटणार

By admin | Updated: September 22, 2015 23:38 IST

कृ ती समितीची बैठक : आमदारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

सटाणा : तालुक्याचे राजकारण करतांना केळझरचे पाणी पळवून आम्ही आरम खोऱ्यातील जनतेला धोका देणार नाही, परंतु आम्हाला मते द्या या अटीवर मतांचा जोगवा मागणाऱ्या आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण या दाम्पत्याने सटाणा शहरासाठी असलेल्या केळझर पाणी पुरवठा योजने संदर्भात येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा गाव बंदी करून चव्हाण दाम्पत्याविरु ध्द आंदोलन पुकारले जाईल अशी टोकाची भूमिका मंगळवारी झालेल्या केळझर कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आली. कृती समितीच्या या इशाऱ्यामुळे भरपावसाळयात केळझरचे पाणी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.सटाणा शहरासाठी केळझर धरणावर ९५ दशलक्षघनफुट पाण्याचे आरक्षण करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सन १९९८ मध्ये या महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरु होण्यापूर्वीच सटाणा शहर विरुध्द लाभक्षेत्रातील दहा गावे असा संघर्ष पेटला.या संघर्षात माजी मंत्री ए. टी. पवार यांनी उडी घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चांगलीच धार आली आणि पाईपलाईनचे काम बंद पाडले. त्यामुळे पालिकेने पाईपलाईन आणि वहिरीचे काम वगळता टप्पा १ व २ चे काम पूर्णत्वास नेले. मात्र उर्वरित कामासाठी दहा गावातील शेतकरी विरूध्द सटाणा शहर असा संघर्ष पेटतच राहिला या आंदोलनाची धग अनेक राजकारण्यांना मारक आणि पोषकही ठरली. दरम्यान चव्हाण दाम्पत्याने पुनंदचे पाणी आणण्यासाठी केळझर योजना गुंडाळण्याचा पारित केलेला ठराव पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनी हाणून पाडत केळझरचे हक्काचे पाणीच आम्हाला हवे अशी भूमिका घेऊन आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आरम खोऱ्यातील केळझर कृती समितीला आठ वर्षांनंतर पुन्हा जाग आली असून पूर्वीची भूमिका कायम ठेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) दुपारी डांगसौंदाणे येथे समितीने शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वानुमते चव्हाण दाम्पत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी आपली मते मांडताना गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण यांनी केळझर धरणातून शहरासाठी एक थेंब घेणार नाही अशी भूमिका घेऊन मतांचा जोगवा मागितला आहे. त्यामुळे चव्हाण आमचा विश्वासघात करणार नाही ही आम्हाला खात्री असून त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. येत्या दोन दिवसात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्या विरु द्ध आंदोलनाचा पावित्रा घेण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुढील आठवड्यात चौधाने येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचेही कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, कृती समितीचे सचिव कैलास बोरसे, केदाबापू काकुळते, एन. डी. जाधव, कडू सावकार , माहरू दगा पाटील यांची भाषणे झाली. बैठकीस मुंजवाडचे सरपंच गणेश जाधव, संजय जगदाळे, गुलाब जाधव, भास्कर बिरारी, किसनदास बैरागी, निकवेलचे सरपंच दीपक वाघ, अमृता बिरारी, संजय बिरारी, धनिसंग दातरे , देवराम टोपले यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)