सटाणा : चांगल्या आणि उपक्र मशील कार्याला सतत विरोध होत असतो; मात्र या कामात सातत्य ठेवल्यास एक ना एक दिवस जनता अशा व्यक्तीच्या पाठीवर थाप मारल्याशिवाय राहत नाही, म्हणून आगामी गणेशोत्सवाच्या काळात सर्व गणेश मंडळांनी सामाजिक उपक्र म राबवून चांगले काम सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी केले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सटाणा पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.प्रास्ताविक अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. यावेळी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष विलास बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शिवसेनेचे नेते अरविंद सोनवणे, कॉँग्रेसचे किशोर कदम, सरोज चंद्रात्रे, श्रीकांत रौंदळ, कैलास येवला, प्रवीण पवार यांनी मनोगतातूनविविध सूचना मांडल्या.मागील वर्षी गणेशोत्सवात चांगली कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विविध जातीचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला. गणेश मंडळांनी अनुचित प्रकार न करता गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. बैठकीसाठी तहसीलदार सुनील सैंदाणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पालिका गटनेते काका रौंदळ, विजय वाघ, शरद शेवाळे, आनंदा महाले, सुनील मोरे, पंकज सोनवणे, फईम शेख, मनोहर पवार, चंद्रकांत सोनवणे, काका सोनवणे आदिंसह विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
चांगले, उपक्र मशील कार्य सुरू ठेवा
By admin | Updated: September 3, 2016 23:49 IST