शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

‘आळंदी’चे पाणी शेतीसाठीच राखीव ठेवा

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

देवीदास पिंगळे : सेंट्रल गोदावरीचे निवेदन

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय चुकीचा असून, कोणत्याही धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्यात येऊ नये, अशी मागणी सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी बॅँकेच्या संचालकांनी केली. तर आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.माजी खासदार देवीदास पिंगळे व सेंट्रल गोदावरी कृषक सेवक संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी धरणालगत बहुतांश शेतकऱ्यांच्या फळबागा असून, शेतकऱ्यांना फळबागेसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आळंदी धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी राखीव न ठेवल्यास फळबागा उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आळंदी धरणातील पाणी शेतीसाठी व जनावरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केली आहे.तसेच सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्णात कमी पाऊस झालेला असल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यास जिल्ह्णातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची परिस्थिती वाईट होऊ शकते. आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय नद्या जोड प्रकल्प राबवावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण बेंडकुळी, मधुकर खांडबहाले, रामदास चव्हाण, पुंजाराम थेटे, तानाजी पिंगळे, अनिल काकड, रामदास पिंगळे, संदीप पाटील, निवृत्ती शिंदे, अमोल पाटील, पंडित कातड, ज्ञानेश्वर वाघ, शंकर डबले, मोतीराम गायकर, पंडित गायकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)