शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

शेती अन् शेतकरी डोळ्यासमोर ठेवा

By admin | Updated: April 12, 2015 00:50 IST

शरद पवार यांचे मोदींवर टीकास्र : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी लोकसभेत भांडणार

नाशिक : सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून करार करावेत. कारण आताच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.नैसर्गिक संकटे येतच असतात. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीसाठी एक स्वतंत्र समिती असते. या समितीचे मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. आता या समितीचे कृषिमंत्री सदस्य असतात. आता राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या बैठकांमध्ये या नुकसानभरपाईसाठी काही मदत करण्याचा निर्णय झाल्याचे आपल्याला अद्याप समजलेले नाही. आपण सांगितल्यानंतर कृषिमंत्री नाशिकला येऊन गेले. आताच्या राज्य व केंद्र सरकारचे शेती आणि शेतकरी या घटकांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. राजनाथ सिंह आता या समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र, या समितीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी बजेटमध्ये १० ते १२ हजार कोटींची तरतूद असते.  त्यातून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देता येते. मात्र, या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही. शेती आणि शेतकरी यांना या सरकारमध्ये दुय्यम स्थान आहे. आम्ही येत्या लोकसभा अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. मात्र, लोकशाहीत राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार लोकांचा आहे, आम्हाला तसे अधिकार आता लोकांनी दिलेले नाही. मात्र, त्यांच्या प्रश्नावर भांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. नैसर्गिक आपत्ती ही दरवर्षी येतच राहते. ते नैसर्गिक संकट आहे. त्यातून शेतकऱ्यांना व जनतेला कशी मदत करायची, हे सरकारचे काम आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते सुलभ करून कर्जाचे पुनर्गठन केले पाहिजे. यांसह अनेक बाबी सरकारला करता येण्यासारख्या आहेत. मात्र, दुर्दैवाने सरकार गेल्या सात-आठ महिन्यांत ते करताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी करार करताना आणि सरकार चालविताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले पाहिजेत, त्यासाठी आम्ही विरोधक म्हणून सातत्याने पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री आमदार छगन भुजबळ, समीर भुजबळ,विनायकराव पाटील,रवींद्र पगार आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..