शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीमुळे करपले माणूसपण

By admin | Updated: July 13, 2015 00:07 IST

विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : माणूस हा सामाजिक प्राणी असून, त्याची स्वतंत्र विचार-क्षमतादेखील आहे; मात्र टीव्हीच्या वाहिन्यांच्या हल्ल्यामुळे माणसाची स्वतंत्र वैचारिक क्षमता धोक्यात आली आहे. परिणामी माणसाचे माणूसपण करपलं जात असून, माणसाने विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. टीव्हीवरून लादले जाणारे विचार ‘जैसे-थे’ स्वीकारू नये, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले आहे.स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प घळसासी यांनी ‘टीव्ही चॅनल्स्च्या गोंधळात भरकटलेले आपण’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना घळसासी म्हणाले, माणसामध्ये नवी सृष्टी निर्माण करण्याचीही क्षमता आहे; मात्र त्यासाठी माणूसपणाचं भान असणे आवश्यक आहे. टीव्ही माणसाच्या जीवनामध्ये जणू काही महत्त्वाचा घटकच बनला आहे, त्यामुळे टीव्हीला कायमची सोडचिठ्ठी देता येणार नाही आणि टीव्हीला विरोधदेखील नाही; परंतु टीव्ही वाहिन्यांचे (धार्मिक चॅनल्स्सह) विविध कार्यक्रम, चर्चासत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या पत्रपंडितांचे तयार विचार स्वीकारू नये. माणसाने विवेकबुद्धीचा वापर करत स्वतंत्ररीत्या विचार करावा. कारण तयार विचार स्वीकारणे हे घातक आहे हे लक्षात घ्यावे. आवडलेली प्रत्येक गोष्ट ही हीतकारकच असते असा गैरसमज काढून टाकावा, असे आवाहन घळसासी यांनी यावेळी केले. माणसाच्या सामाजिकतेवर आणि स्वतंत्र वैचारिक क्षमतेवर टीव्हीने हल्ला चढविला आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य समाजात आहे; मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यावरच आघात केला जात आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रगतिशील व पुरोगामी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आजच्या चॅनलवाल्यांकडे नाही, असे ते यावेळी म्हणाले. देणारा काही देत असला तरी घेणाऱ्यांनी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवू नये, तर स्वत:च्या विचारक्षमतेने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन घळसासी यांनी श्रोत्यांना उद्देशून केले. यावेळी आमदार सीमा हिरे, सुरेश पाटील, सुमन पाटील, यशवंत पाटील, भीमराव गाडे, डॉ. संजय पाटील, विराज लोमटे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)