शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

टीव्हीमुळे करपले माणूसपण

By admin | Updated: July 13, 2015 00:07 IST

विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : माणूस हा सामाजिक प्राणी असून, त्याची स्वतंत्र विचार-क्षमतादेखील आहे; मात्र टीव्हीच्या वाहिन्यांच्या हल्ल्यामुळे माणसाची स्वतंत्र वैचारिक क्षमता धोक्यात आली आहे. परिणामी माणसाचे माणूसपण करपलं जात असून, माणसाने विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. टीव्हीवरून लादले जाणारे विचार ‘जैसे-थे’ स्वीकारू नये, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले आहे.स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प घळसासी यांनी ‘टीव्ही चॅनल्स्च्या गोंधळात भरकटलेले आपण’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना घळसासी म्हणाले, माणसामध्ये नवी सृष्टी निर्माण करण्याचीही क्षमता आहे; मात्र त्यासाठी माणूसपणाचं भान असणे आवश्यक आहे. टीव्ही माणसाच्या जीवनामध्ये जणू काही महत्त्वाचा घटकच बनला आहे, त्यामुळे टीव्हीला कायमची सोडचिठ्ठी देता येणार नाही आणि टीव्हीला विरोधदेखील नाही; परंतु टीव्ही वाहिन्यांचे (धार्मिक चॅनल्स्सह) विविध कार्यक्रम, चर्चासत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या पत्रपंडितांचे तयार विचार स्वीकारू नये. माणसाने विवेकबुद्धीचा वापर करत स्वतंत्ररीत्या विचार करावा. कारण तयार विचार स्वीकारणे हे घातक आहे हे लक्षात घ्यावे. आवडलेली प्रत्येक गोष्ट ही हीतकारकच असते असा गैरसमज काढून टाकावा, असे आवाहन घळसासी यांनी यावेळी केले. माणसाच्या सामाजिकतेवर आणि स्वतंत्र वैचारिक क्षमतेवर टीव्हीने हल्ला चढविला आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य समाजात आहे; मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यावरच आघात केला जात आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रगतिशील व पुरोगामी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आजच्या चॅनलवाल्यांकडे नाही, असे ते यावेळी म्हणाले. देणारा काही देत असला तरी घेणाऱ्यांनी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवू नये, तर स्वत:च्या विचारक्षमतेने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन घळसासी यांनी श्रोत्यांना उद्देशून केले. यावेळी आमदार सीमा हिरे, सुरेश पाटील, सुमन पाटील, यशवंत पाटील, भीमराव गाडे, डॉ. संजय पाटील, विराज लोमटे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)