शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

टीव्हीमुळे करपले माणूसपण

By admin | Updated: July 13, 2015 00:07 IST

विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : माणूस हा सामाजिक प्राणी असून, त्याची स्वतंत्र विचार-क्षमतादेखील आहे; मात्र टीव्हीच्या वाहिन्यांच्या हल्ल्यामुळे माणसाची स्वतंत्र वैचारिक क्षमता धोक्यात आली आहे. परिणामी माणसाचे माणूसपण करपलं जात असून, माणसाने विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. टीव्हीवरून लादले जाणारे विचार ‘जैसे-थे’ स्वीकारू नये, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले आहे.स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प घळसासी यांनी ‘टीव्ही चॅनल्स्च्या गोंधळात भरकटलेले आपण’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना घळसासी म्हणाले, माणसामध्ये नवी सृष्टी निर्माण करण्याचीही क्षमता आहे; मात्र त्यासाठी माणूसपणाचं भान असणे आवश्यक आहे. टीव्ही माणसाच्या जीवनामध्ये जणू काही महत्त्वाचा घटकच बनला आहे, त्यामुळे टीव्हीला कायमची सोडचिठ्ठी देता येणार नाही आणि टीव्हीला विरोधदेखील नाही; परंतु टीव्ही वाहिन्यांचे (धार्मिक चॅनल्स्सह) विविध कार्यक्रम, चर्चासत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या पत्रपंडितांचे तयार विचार स्वीकारू नये. माणसाने विवेकबुद्धीचा वापर करत स्वतंत्ररीत्या विचार करावा. कारण तयार विचार स्वीकारणे हे घातक आहे हे लक्षात घ्यावे. आवडलेली प्रत्येक गोष्ट ही हीतकारकच असते असा गैरसमज काढून टाकावा, असे आवाहन घळसासी यांनी यावेळी केले. माणसाच्या सामाजिकतेवर आणि स्वतंत्र वैचारिक क्षमतेवर टीव्हीने हल्ला चढविला आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य समाजात आहे; मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यावरच आघात केला जात आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रगतिशील व पुरोगामी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आजच्या चॅनलवाल्यांकडे नाही, असे ते यावेळी म्हणाले. देणारा काही देत असला तरी घेणाऱ्यांनी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवू नये, तर स्वत:च्या विचारक्षमतेने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन घळसासी यांनी श्रोत्यांना उद्देशून केले. यावेळी आमदार सीमा हिरे, सुरेश पाटील, सुमन पाटील, यशवंत पाटील, भीमराव गाडे, डॉ. संजय पाटील, विराज लोमटे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)