शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:38 IST

नाशिक :विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिला होता.भारतीय कम्युनिष्ट पक्षाने बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यापार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सातभर चाललेल्या या आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा उतारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश्ीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला भाव द्या, कसत असलेल्या वनजमिनी नावांवर करा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी येथील वनदावे त्वरीत मंजुर करा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राज्य व केंद्र सरकारने हमी भाव देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा किंमत स्थिरता व मदत निधी उभा करावा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फसवी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. राज्यभर सुकाणू समितीने सरसकट कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल घ्यावी, पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था वाडगाव यांचे कर्ज माफ करा, समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी स्वत:हून स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी पोलिसांनी ३४३ आंदोलकांना अटक करून दुपारनंतर सोडून दिले. या आंदोलनात कॉ. राजू देसले, कॉ. भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, संजय बैरागी, किरण डावखर, नामदेव बोराडे, राजपाल शिंदे, साधना गायकवाड, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, प्रकाश भालके, रतन गायधनी, ज्योती नटराजन, विमल पोरजे, मधुकर कसबे, दत्तात्रय गांगुर्डे, मीना आढाव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले.छावणीचे स्वरूपदोन दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या महापालिकेत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्त्र वेढा दिला. कार्यालयाच्या बाहेर तसेच आवारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिन्ही प्रवेशद्वार बंद करून घेऊन विचारपूस करूनच अभ्यागतांना सोडण्यात येत होते. अगदी आंदोलकांना अटक केल्यानंतरही सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.