शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:38 IST

नाशिक :विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिला होता.भारतीय कम्युनिष्ट पक्षाने बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यापार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सातभर चाललेल्या या आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा उतारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश्ीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला भाव द्या, कसत असलेल्या वनजमिनी नावांवर करा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी येथील वनदावे त्वरीत मंजुर करा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राज्य व केंद्र सरकारने हमी भाव देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा किंमत स्थिरता व मदत निधी उभा करावा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फसवी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. राज्यभर सुकाणू समितीने सरसकट कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल घ्यावी, पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था वाडगाव यांचे कर्ज माफ करा, समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी स्वत:हून स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी पोलिसांनी ३४३ आंदोलकांना अटक करून दुपारनंतर सोडून दिले. या आंदोलनात कॉ. राजू देसले, कॉ. भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, संजय बैरागी, किरण डावखर, नामदेव बोराडे, राजपाल शिंदे, साधना गायकवाड, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, प्रकाश भालके, रतन गायधनी, ज्योती नटराजन, विमल पोरजे, मधुकर कसबे, दत्तात्रय गांगुर्डे, मीना आढाव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले.छावणीचे स्वरूपदोन दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या महापालिकेत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्त्र वेढा दिला. कार्यालयाच्या बाहेर तसेच आवारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिन्ही प्रवेशद्वार बंद करून घेऊन विचारपूस करूनच अभ्यागतांना सोडण्यात येत होते. अगदी आंदोलकांना अटक केल्यानंतरही सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.