शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:38 IST

नाशिक :विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिला होता.भारतीय कम्युनिष्ट पक्षाने बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यापार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सातभर चाललेल्या या आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा उतारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश्ीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला भाव द्या, कसत असलेल्या वनजमिनी नावांवर करा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी येथील वनदावे त्वरीत मंजुर करा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राज्य व केंद्र सरकारने हमी भाव देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा किंमत स्थिरता व मदत निधी उभा करावा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फसवी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. राज्यभर सुकाणू समितीने सरसकट कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल घ्यावी, पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था वाडगाव यांचे कर्ज माफ करा, समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी स्वत:हून स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी पोलिसांनी ३४३ आंदोलकांना अटक करून दुपारनंतर सोडून दिले. या आंदोलनात कॉ. राजू देसले, कॉ. भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, संजय बैरागी, किरण डावखर, नामदेव बोराडे, राजपाल शिंदे, साधना गायकवाड, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, प्रकाश भालके, रतन गायधनी, ज्योती नटराजन, विमल पोरजे, मधुकर कसबे, दत्तात्रय गांगुर्डे, मीना आढाव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले.छावणीचे स्वरूपदोन दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या महापालिकेत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्त्र वेढा दिला. कार्यालयाच्या बाहेर तसेच आवारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिन्ही प्रवेशद्वार बंद करून घेऊन विचारपूस करूनच अभ्यागतांना सोडण्यात येत होते. अगदी आंदोलकांना अटक केल्यानंतरही सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.