शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कन्याकुमारी-काश्मीर पदयात्रेकरू पी. एन. भारतचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

कोरोनाच्या महामारीत अनेकांचे बळी गेले तर अनेक जण हैराण झालेत. काळजी घेण्यापलीकडे आपल्या हातात काही नसून खरा मानवतेचा संदेश ...

कोरोनाच्या महामारीत अनेकांचे बळी गेले तर अनेक जण हैराण झालेत. काळजी घेण्यापलीकडे आपल्या हातात काही नसून खरा मानवतेचा संदेश देण्यासाठी भारत पीएन हे म्हैसूरचा व्यावसायिक स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन निघाले आहेत. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गही वाचला पाहिजे हा संदेश देत ते पुढील प्रवास सुरू करतात. दररोज ३० किलोमीटरचा प्रवास करत आतापर्यंत दोनशे गावांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत.

वावीत आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. येथील साई भक्त निवासमध्ये मुक्काम करून पुढील प्रवासासाठी भारत पीएन रवाना झाले. यावेळी महेश पतसंस्थेचे अध्यक्ष विजय सोमाणी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विलास पठाडे, आशीष माळवे, संदीप राजेभोसले, भरत आनप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट...

‘मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळात पैसा कामाला नसून मानवता धर्म हाच कामी आला. हाच संदेश मी देत पदयात्रा करीत आहे.

- भारत पीएन, यात्रेकरू, म्हैसूर