शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे कांदा हब उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:02 IST

देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

विंचूर : देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.विंचूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गुरुवारी कांदा लिलावाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल कदम, लासलगाव कृषी उत्पन्न समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुरेश काकड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, विंचूरच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर आदि उपस्थित होते. राज्यमंत्री खोत म्हणाले, राज्य शासन लासलगाव येथे कांदा हब होण्यासाठी केंद्राच्या कृषी व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. या हबचा फायदा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात होईल. कांद्याचे भाव कमी-अधिक होत असल्याने शेतकºयाला चांगला भाव मिळण्यासाठी कांदा साठवणुकीची योग्य व्यवस्था होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहेत. यासाठी जास्तीत जास्त वेअर हाऊस निर्माण केली जातील. सध्या कांद्याला चांगला भाव असून, तो तसाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने आत्ताचे आयात-निर्यात धोरण बदलू नये व कांदा साठवणुकीवर बंदी आणू नये याबाबत विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. खोत पुढे म्हणाले, शेतकºयांच्या हितानुसार निर्णय घेतला जात असून, सोयाबीनवर आयात कर वाढवण्यात आला. तूर खरेदी शासन हमीभावाने करताना ७५ लाख टन खरेदी करण्यात आली आहे. यासाठी म्हणून बाहेरून आयात होणाºया उडीदवरील आयात कमाल मर्यादा तीन लाख टनावर आणण्यात आली आहे तर तूर डाळीवर दोन लाख टन आयातीचे बंधन घातले गेले. यामुळे सोयाबीनचा भाव ६ हजार रु. प्रति. क्विंटल, उडीद ६४०० प्रति क्विंटल झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकºयांना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी चालू वर्षी नाशिक जिल्ह्यात १५ कोटी २८ लाख अनुदान व मागील प्रलंबित अनुदान देण्यासाठी ३२ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. पाशा पटेल म्हणाले, शेतकºयांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी राज्याचे कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली असून, १ जुलैपासून आयोगाने काम सुरू केले आहे. नाशवंत मालाला हमीभाव देण्यासाठी पणन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत आहे. कांद्यालादेखील हमीभाव देण्याबाबतचा निर्णय सहा महिन्यात घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास यासाठी विशेष शिष्टमंडळ स्थापन करून प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे, असे पटेल म्हणाले.