शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

लासलगाव येथे कांदा हब उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:02 IST

देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

विंचूर : देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.विंचूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गुरुवारी कांदा लिलावाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल कदम, लासलगाव कृषी उत्पन्न समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुरेश काकड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, विंचूरच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर आदि उपस्थित होते. राज्यमंत्री खोत म्हणाले, राज्य शासन लासलगाव येथे कांदा हब होण्यासाठी केंद्राच्या कृषी व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. या हबचा फायदा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात होईल. कांद्याचे भाव कमी-अधिक होत असल्याने शेतकºयाला चांगला भाव मिळण्यासाठी कांदा साठवणुकीची योग्य व्यवस्था होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहेत. यासाठी जास्तीत जास्त वेअर हाऊस निर्माण केली जातील. सध्या कांद्याला चांगला भाव असून, तो तसाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने आत्ताचे आयात-निर्यात धोरण बदलू नये व कांदा साठवणुकीवर बंदी आणू नये याबाबत विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. खोत पुढे म्हणाले, शेतकºयांच्या हितानुसार निर्णय घेतला जात असून, सोयाबीनवर आयात कर वाढवण्यात आला. तूर खरेदी शासन हमीभावाने करताना ७५ लाख टन खरेदी करण्यात आली आहे. यासाठी म्हणून बाहेरून आयात होणाºया उडीदवरील आयात कमाल मर्यादा तीन लाख टनावर आणण्यात आली आहे तर तूर डाळीवर दोन लाख टन आयातीचे बंधन घातले गेले. यामुळे सोयाबीनचा भाव ६ हजार रु. प्रति. क्विंटल, उडीद ६४०० प्रति क्विंटल झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकºयांना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी चालू वर्षी नाशिक जिल्ह्यात १५ कोटी २८ लाख अनुदान व मागील प्रलंबित अनुदान देण्यासाठी ३२ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. पाशा पटेल म्हणाले, शेतकºयांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी राज्याचे कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली असून, १ जुलैपासून आयोगाने काम सुरू केले आहे. नाशवंत मालाला हमीभाव देण्यासाठी पणन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत आहे. कांद्यालादेखील हमीभाव देण्याबाबतचा निर्णय सहा महिन्यात घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास यासाठी विशेष शिष्टमंडळ स्थापन करून प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे, असे पटेल म्हणाले.