शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: January 17, 2016 21:52 IST

समस्यांचा डोंगर : मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन ढेपाळले; नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया

कळवण : नव्यानेच स्थापन झालेल्या कळवण नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना सतावत आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व उपनगराध्यक्ष अनिता महाजन यांनी केली आहे.वसाका कार्यस्थळावर सोमवारी (दि. १८) होणाऱ्या गळीत हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे येणार असून, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण नगरपंचायतीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. नगरपंचायतीला ग्रामपंचायतीपेक्षा जादा विकास निधी येत असल्याने मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना होती. नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली. त्याला आता दोन ते तीन महिने झाले. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.गेल्या दोन महिन्यांच्या काळात केवळ पदाधिकारी व सदस्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाव्यतिरिक्त सदस्यांच्या केवळ सभा होतात. मात्र मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामाची अंमलबजावणी करता येत नाही. मुख्याधिकाऱ्याविना शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामपंचायत काळात मंजूर कामे शहरात सुरू आहे. अनेक नवीन बांधकामे सुरू करण्यासाठी नागरिक नगरपंचायत कार्यालयात चकरा मारतात. परंतु परवानगी द्यायलाच कुणी अधिकारी नाही. शहरातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते आदि प्रभागातील कामांची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कामकाज करण्याचे नियंत्रण आहे. नळ योजनेच्या व दिवाबत्ती दुरुस्तीसाठीचा खर्च द्यायचा कुणी, हा प्रश्न आहे, त्यामुळे समस्या वाढत आहे. कळवणकरांच्या आशा व अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. परंतु मुख्याधिकारी नसल्याने कामे ठप्प आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, गटनेते कौतिक पगार, नगरसेवकांनी केली आहे.(वार्ताहर)