शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: January 17, 2016 21:52 IST

समस्यांचा डोंगर : मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन ढेपाळले; नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया

कळवण : नव्यानेच स्थापन झालेल्या कळवण नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना सतावत आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व उपनगराध्यक्ष अनिता महाजन यांनी केली आहे.वसाका कार्यस्थळावर सोमवारी (दि. १८) होणाऱ्या गळीत हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे येणार असून, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण नगरपंचायतीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. नगरपंचायतीला ग्रामपंचायतीपेक्षा जादा विकास निधी येत असल्याने मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना होती. नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली. त्याला आता दोन ते तीन महिने झाले. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.गेल्या दोन महिन्यांच्या काळात केवळ पदाधिकारी व सदस्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाव्यतिरिक्त सदस्यांच्या केवळ सभा होतात. मात्र मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामाची अंमलबजावणी करता येत नाही. मुख्याधिकाऱ्याविना शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामपंचायत काळात मंजूर कामे शहरात सुरू आहे. अनेक नवीन बांधकामे सुरू करण्यासाठी नागरिक नगरपंचायत कार्यालयात चकरा मारतात. परंतु परवानगी द्यायलाच कुणी अधिकारी नाही. शहरातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते आदि प्रभागातील कामांची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कामकाज करण्याचे नियंत्रण आहे. नळ योजनेच्या व दिवाबत्ती दुरुस्तीसाठीचा खर्च द्यायचा कुणी, हा प्रश्न आहे, त्यामुळे समस्या वाढत आहे. कळवणकरांच्या आशा व अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. परंतु मुख्याधिकारी नसल्याने कामे ठप्प आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, गटनेते कौतिक पगार, नगरसेवकांनी केली आहे.(वार्ताहर)