शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणकरांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: September 11, 2016 01:04 IST

सामाजिक बांधिलकी : अनावश्यक खर्चाला फाटा देत बसविले ‘एटीएम’

 कळवण : स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक व्यासपीठ. मनोरंजनाचे कार्यक्र मही दर्जेदार असत. आता मात्र गणेशोत्सव दिखाऊ झालेला असताना कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगारप्रणीत महाराज युवा फाउंडेशन सोशल गु्रपने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकीतून शुध्द पिण्याच्या पाण्याच्या एटीएमची सुविधा कळवणकरांना उपलब्ध करु न देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शुध्द पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शहरात अजून दोन ठिकाणी एटीएम बसविण्याचा मानस यावेळी मंडळाने व्यक्त केला.झगमगाटी आणि डोळे दिपवणारी सजावट , २१ फुटी किंवा त्याहीपेक्षा उंच मूर्तीवर वारेमाप खर्च , गुलाल व ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक या सर्व गोष्टींना फाटा देऊन महाराज युवा फाऊंडेशन सोशल ग्रृपने स्थापनेच्या पिहल्याच वर्षी कळवणकरांसाठी पाच रुपयांत २० लीटर शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणारी एटीएम सुविधेचा शुभारंभ प पू श्री श्री १००८ महामंडलेश्वर राष्ट्रसंत इंद्रदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात येऊन कळवणकरांसाठी लोकार्पण करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सुनीता पगार, गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे , जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, कांदा व्यापारी योगेश महाजन, नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, साहेबराव पगार, बाळासाहेब जाधव, सागर जगताप आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गणेशोत्सवाचा समाज प्रबोधनाचा मूळ उद्देश कुठे तरी हरवून चालला आहे. मोठ्या शहरांमधील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे वर्षभर काही ना काही सामाजिक कार्य करत असले तरी गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचायला हवा तो पोचत नाही हे लक्षात घेऊन महाराज युवा फाऊंडेशन सोशल ग्रुपने सामाजिक बांधिलकीतुन शुध्द पिण्याचे पाण्याची पुरवठा करणारी यंत्रणा उभी करु न अत्यंत अल्पदरात सुविधा उपलब्ध करु न दिल्याने याचा शहरातील सर्वसामान्य कुटुंबाना तसेच व्यापारी व व्यावसायिकांना उपयोग होणार आहे. शहरात अजून दोन ठिकाणी एटीएम बसविण्याचा मानस असल्याची माहिती यावेळी मंडळाचे मार्गदर्शक भूषण पगार यांनी दिली. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रोहीत पगार, अध्यक्ष पंकज पाचिपंड, उपाध्यक्ष राजेंद्र पगार, नंदू पगार, गणेश शिरोडे, हरिश जाधव, असलम शेख, सुधाकर खैरनार, राहुल पगार, सुनिल गांगुर्डे, बालु गांगुर्डे, धीरज निकम,नरेंद्र चव्हाण, प्रवीण वाघ किशोर चव्हाण विनोद मालपूरे पराग देशमुख भालचंद्र वाघ आबा पगार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)