शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पर्यावरण रक्षणार्थ कळसूबाई शिखराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:08 IST

तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे.

सुनील शिंदे।इगतपुरी : तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात पर्यावरणाच्या रक्षणार्थ हे युवक शिखरावर स्वच्छता मोहीम राबवित आहे.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेऊन गेल्या २१ वर्षांपासून या कार्यात झोकून देणाºया युवकांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची ख्याती राज्यभर पसरली आहे. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपणासह एकात्मतेचा संदेश देणारे हे युवक तालुकाभर कौतुकास्पद कामिगरी करीत आहेत.शिखरावर घटस्थापना करून पहिल्या माळेपासून स्वच्छतेला सुरुवात केली. या कार्यात सहभागी झालेले कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, गजानन चव्हाण, नीलेश आंबेकर, बालाजी तुंबारे, प्रवीण भटाटे, शिवा जाधव, देवीदास पाखरे, किसन दराणे, उमेश रावळ, पंढरीनाथ दुर्गुडे, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे, रमेश हेमके, नितीन भागवत, सोनू गिते, श्रवण सोपे, गोरख लगडे, जालिंदर घाणे, निवृत्ती खाडे, गोरख डगळे, कैलास धिंदळे, लोहरे सर, चेतन छत्रे, शिवदास जोशी, भगवान तोकडे, किसन दराणे सर व इतर देवीभक्त सहभागी झाले आहेत. मराडे यांनी नवरात्र काळात नऊ दिवस कळसूबाई दर्शनाला जाण्याची कल्पना सहकाºयांपुढे मांडली. या कल्पनेस मित्रांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नवरात्रीतील नऊ दिवस कळसूबाईच्या दर्शनाला जाण्याची तयारी दर्शवली. सहकार्यांच्या मदतीने कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवात स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  मंडळातकोणतीही यात्रा,उत्सव धार्मिक कार्यक्र म सार्वजनिक कार्यकम हे संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा र्हास होतो.राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर सर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्र मातच मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,यापुढेही हा उपक्र म कायम चालू राहील. - भगीरथ मराडे, संस्थापकीय अध्यक्ष,कळसुबाई मित्र मंडळ