शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणार्थ कळसूबाई शिखराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:08 IST

तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे.

सुनील शिंदे।इगतपुरी : तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात पर्यावरणाच्या रक्षणार्थ हे युवक शिखरावर स्वच्छता मोहीम राबवित आहे.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेऊन गेल्या २१ वर्षांपासून या कार्यात झोकून देणाºया युवकांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची ख्याती राज्यभर पसरली आहे. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपणासह एकात्मतेचा संदेश देणारे हे युवक तालुकाभर कौतुकास्पद कामिगरी करीत आहेत.शिखरावर घटस्थापना करून पहिल्या माळेपासून स्वच्छतेला सुरुवात केली. या कार्यात सहभागी झालेले कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, गजानन चव्हाण, नीलेश आंबेकर, बालाजी तुंबारे, प्रवीण भटाटे, शिवा जाधव, देवीदास पाखरे, किसन दराणे, उमेश रावळ, पंढरीनाथ दुर्गुडे, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे, रमेश हेमके, नितीन भागवत, सोनू गिते, श्रवण सोपे, गोरख लगडे, जालिंदर घाणे, निवृत्ती खाडे, गोरख डगळे, कैलास धिंदळे, लोहरे सर, चेतन छत्रे, शिवदास जोशी, भगवान तोकडे, किसन दराणे सर व इतर देवीभक्त सहभागी झाले आहेत. मराडे यांनी नवरात्र काळात नऊ दिवस कळसूबाई दर्शनाला जाण्याची कल्पना सहकाºयांपुढे मांडली. या कल्पनेस मित्रांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नवरात्रीतील नऊ दिवस कळसूबाईच्या दर्शनाला जाण्याची तयारी दर्शवली. सहकार्यांच्या मदतीने कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवात स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  मंडळातकोणतीही यात्रा,उत्सव धार्मिक कार्यक्र म सार्वजनिक कार्यकम हे संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा र्हास होतो.राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर सर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्र मातच मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,यापुढेही हा उपक्र म कायम चालू राहील. - भगीरथ मराडे, संस्थापकीय अध्यक्ष,कळसुबाई मित्र मंडळ