शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

‘कालिदास’मध्ये बदल दिसेना !

By admin | Updated: August 9, 2015 23:55 IST

प्रशांत दामले यांनी व्यक्त केली खंत

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुधारणेला प्रारंभ झाला असला, तरी अद्याप तरी नाट्यगृहात दिसण्याजोगा कोणताही बदल झालेला नाही. खुर्च्या, स्वच्छतागृहे तशीच असून, त्यांच्या कड्या दोन्ही बाजूंनी लागत नाही. त्यामुळे आत जाणाऱ्याला गाणे गावे लागते, असा टोला अभिनेते तथा व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी लगावला. नाटकाच्या प्रयोगासाठी नाशिकमध्ये आलेल्या दामले यांनी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना देण्यासाठीचे निवेदन पत्रकारांना सादर केले. ते म्हणाले, ‘कालिदास’मध्ये नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर कलावंतांसाठी बसून जेवणाची सोय होणे अत्यंत गरजेचे आहे. लॉजिंगची अवस्थाही बिकट आहे. दुरवस्था दूर करण्यासाठी संपूर्ण रस घेऊन काम करणाऱ्या पूर्णवेळ, कायमस्वरूपी अधिकाऱ्याची गरज आहे. शहरातील ज्येष्ठ रंगकर्मीला सहायक व्यवस्थापकपद दिल्यास तो अडचणी ओळखून त्यावर मार्ग काढू शकेल. कालिदासमध्ये सुधारणा करणे हे केवळ आठ-दहा दिवसांचे काम आहे. फक्त इच्छाशक्ती हवी. आज दुपारी नाटकाचा प्रयोग सादर केला; मात्र नाट्यगृहात कोणतेही ठोस बदल दिसले नाहीत, असेही ते म्हणाले. आपली नाट्य प्रशिक्षण संस्था ‘टी स्कूल’ नाशिकमध्ये सुरू व्हावी, अशी इच्छा आहे; मात्र शिक्षकांची अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्या हस्ते दामले यांचा सत्कार करण्यात आला. हॉल नूतनीकरणासाठी देणगी दिल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. रवींद्र ढवळे, श्याम दशपुत्रे, ईश्वर जगताप, राजेंद्र जाधव, सुनील परमार, महेश डोकफोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)