शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्या शेतकऱ्यांनी गाठले कुष्णकुंज

By admin | Updated: September 11, 2015 22:58 IST

राज ठाकरे : शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नये

कळवण : यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक नियोजन कोलमडून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नका, यामुळे प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.कळवण तालुक्यातील विविध भागातील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कैफियत मांडली. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे लोण कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात येऊन पोहोचल्याने शेतकरी हतबल झाला आहे. राज ठाकरे म्हणाले, शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा, आत्महत्त्या करून प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न वाढतील त्यामुळे धीर धरा, असे आवाहन केले.नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून नार-पार योजनेसह प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत माहिती घेऊन ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम यापुढे मनसे करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.यावेळी जिल्ह्याच्या विविध समस्यांचे निवेदन प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील व शहराध्यक्ष नितीन पगार यांनी राज ठाकरे यांना देऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.कळवणचे प्रगतिशील शेतकरी दिनकर पगार, मुरलीधर पगार, सुरेश देवरे, जिभाऊ वाघ, लखन अहेर, दादाजी पाटील, भय्या पगार, दीपक दुसाने आदिंसह शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)