वावी : कोजागरी पौर्णिमेपासून येथील विठ्ठल मंदिरात सुरू झालेल्या काकड आरतीत भाविक अक्षरश: मंत्रमुग्ध होत आहेत.येथील विठ्ठल मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकड आरती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. या महिनाभराच्या कालावधीत पहाटे येणाऱ्या भाविकांमुळे विठ्ठल मंदिरातील वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे. कोजागरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे काकडा आरती व भजने होत आहेत. कमळाताई जाजू, ह. भ. प. जगन्नाथ शिंदे गुरुजी, रमेश बिडवे, राजेंद्र खांबेकर, बद्रिनाथ खर्डे, गणेश क्षत्रिय, दत्तात्रय विधाते, हेमलता जाजू, गणपत नवले, माधव थोरात, विठ्ठल भगत, गोपीनाथ उदावंत, जयश्री जोशी, रामेश्वर जाजू, प्रमिला शेलार, सचिन पठाडे, कमलाबाई मालपाठक, मोहिणी केसकर, सीताबाई बिडवे, यमुनाबाई नवले, विठाबाई लावरे, सुशीला खांबेकर, ज्योती जाजू, मनीषा जाजू, अर्चना आंबेकर, संजीवनी भसे, सुमन गवळी, राजूबाई राजेभोसले, सईबाई मराळे, बेबी कर्पे, आशा बिडवे, कारभारी मंडलिक, पप्पू शिंदे, शेलार, वर्षा मालपाणी, भारती मालपाणी, राधाबाई धूत, कुसूम सोमाणी, अलका तुपसुंदर, मंजू मालपाणी, मंगल विधाते, जयश्री देसाई, जयश्री जाजू , उज्ज्वला जाजू, सौ. संगीता कर्पे, ठकूबाई मंडलिक, गीता भुसे, मनीषा मालपाणी, कौशल्या शिवदे यांच्यासह महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. गेल्या अनेक वर्षांची काकड आरतीची परंपरा ग्रामस्थांनीटिकवून धरली आहे. दोन तास चालणाऱ्या काकडा आरतीची सुरुवात भूपाळीने होऊन त्यानंतर भजनात सर्वजण दंग होऊन जातात. (वार्ताहर).
काकड आरतीत वावीकर मंत्रमुग्ध
By admin | Updated: November 14, 2015 22:00 IST