शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कैलास सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बालपण’ भारत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:16 IST

भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची भारत यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.

नाशिक : भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची भारत यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ यात्रेसंदर्भात नाशिक जिल्हा स्वयंसेवी संघटनेची (एन.जी.ओ. फोरम) बैठक अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी चौकातील सभागृहात झाली. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाचे समन्वयक जुनेदखान (नवी दिल्ली), राज्य समन्वयक अ‍ॅड. आनंद महाजन, किरण थोरात उपस्थित होते. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाच्या समन्वयकांनी भारत यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. सदर यात्रा महाराष्ट्रात दि. २५ सप्टेंबरला सोलापूर येथे येणार असून, दि. २६ रोजी पुणे, २७ रोजी मुंबई, २९ रोजी नाशिक, ३० रोजी धुळे येथून मध्य प्रदेशात जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला राजू शिरसाठ, हेमा पटवर्धन, आसावरी देशपांडे, शोभा पवार, प्रमोद जाधव, डॉ. प्रभाकर वडजे, डॉ. प्रकाश अहेर, अविनाश पाटील, अश्विनी न्याहरकर, अमोल जोशी, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.