शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कृषिरथ माघारी धाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:22 IST

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत.

ठळक मुद्देसदस्य संतप्त : कृषी विभाग शेतकऱ्यांना माहिती देत नसल्याचा आरोप

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत. कृषी विभागाकडून या पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याची अपेक्षा असताना कृषी विभाग कापशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी जनजागृती रथ फिरवत असल्याबाबत व या उपक्रमास वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात नसल्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून शेतकºयांना न बोलविता जनजागृती करताच, कशी असा सवाल उपस्थित करून जनजागृती रथाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.कृषी विभाग व महिको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी वावी मंडळांतर्गत शेतकºयांसाठी जनजागृती रथाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही शेतकºयास माहिती न देताच अचानकपणे वावी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास या जनजागृती रथाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांच्यासह काही मोजक्याच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना बोंडअळी जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण धाडण्यात आले.या जनजागृती कार्यक्रमास प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी उपस्थित होते. त्यामुळे उपसरपंच विजय काटे यांनी रथाच्या शुभारंभाचे नारळ वाढविण्यास नकार देत अगोदर जळून चालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली. औपचारिकता म्हणून फिरविला रथशेतकºयांना माहिती द्या आणि मग जनजागृती कार्यक्रम घ्या, असा सल्ला देत सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे उपस्थित कृषी कर्मचाºयांना रथ घेऊन परिसरातील गावांतून शेतकरी असो वा नसो केवळ औपचारिकता म्हणून रथ फिरविण्याची वेळ आली.गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग व माहिको कंपनीकडून जनजागृतीसाठी या रथाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वावीच्या मंडळ कृषी कार्यालयावर नामुष्कीची वेळ आल्याची चर्चा होती.शेतकºयांना कोणतीही माहिती न देता कृषी विभागाने बोंडअळी नियंत्रण जनजागृतीचा रथ बोलविला. जनजागृती करण्यास आमचा विरोध नाही, उलट सदर उपक्रम स्तुत्यच आहे. मात्र कार्यक्रमास केवळ व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकºयांना याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे नारळ वाढवून शुभारंभ केला नाही. पावसाअभावी पिके करपून चालली आहे. त्याचे पंचनामे करण्याची मागणी केली. वावी मंडळाकडून शेतकºयांना कोणत्याही कृषी योजनांची माहिती दिली जात नाही.- विजय काटे, उपसरपंच, वावी