शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कृषिरथ माघारी धाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:22 IST

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत.

ठळक मुद्देसदस्य संतप्त : कृषी विभाग शेतकऱ्यांना माहिती देत नसल्याचा आरोप

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत. कृषी विभागाकडून या पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याची अपेक्षा असताना कृषी विभाग कापशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी जनजागृती रथ फिरवत असल्याबाबत व या उपक्रमास वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात नसल्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून शेतकºयांना न बोलविता जनजागृती करताच, कशी असा सवाल उपस्थित करून जनजागृती रथाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.कृषी विभाग व महिको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी वावी मंडळांतर्गत शेतकºयांसाठी जनजागृती रथाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही शेतकºयास माहिती न देताच अचानकपणे वावी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास या जनजागृती रथाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांच्यासह काही मोजक्याच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना बोंडअळी जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण धाडण्यात आले.या जनजागृती कार्यक्रमास प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी उपस्थित होते. त्यामुळे उपसरपंच विजय काटे यांनी रथाच्या शुभारंभाचे नारळ वाढविण्यास नकार देत अगोदर जळून चालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली. औपचारिकता म्हणून फिरविला रथशेतकºयांना माहिती द्या आणि मग जनजागृती कार्यक्रम घ्या, असा सल्ला देत सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे उपस्थित कृषी कर्मचाºयांना रथ घेऊन परिसरातील गावांतून शेतकरी असो वा नसो केवळ औपचारिकता म्हणून रथ फिरविण्याची वेळ आली.गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग व माहिको कंपनीकडून जनजागृतीसाठी या रथाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वावीच्या मंडळ कृषी कार्यालयावर नामुष्कीची वेळ आल्याची चर्चा होती.शेतकºयांना कोणतीही माहिती न देता कृषी विभागाने बोंडअळी नियंत्रण जनजागृतीचा रथ बोलविला. जनजागृती करण्यास आमचा विरोध नाही, उलट सदर उपक्रम स्तुत्यच आहे. मात्र कार्यक्रमास केवळ व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकºयांना याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे नारळ वाढवून शुभारंभ केला नाही. पावसाअभावी पिके करपून चालली आहे. त्याचे पंचनामे करण्याची मागणी केली. वावी मंडळाकडून शेतकºयांना कोणत्याही कृषी योजनांची माहिती दिली जात नाही.- विजय काटे, उपसरपंच, वावी