शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

‘कडू’ घटनेनंतरही अपंगांची परवडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:35 IST

महापालिका : विभागीय कार्यालयांमध्ये ‘रॅम्प’चा अभाव; कृती आराखड्यामध्ये समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाब विचारल्यानंतर १८ कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी, त्यात महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा कुठेही उल्लेख नाही. सद्यस्थितीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये एकमेव पंचवटी कार्यालय वगळता अन्य ठिकाणी लिफ्टची सुविधा नाही. तसेच रॅम्पही नसल्याने अपंग बांधवांना पायऱ्या चढण्याचे कष्ट झेलावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेने शुक्रवार (दि.२८)पासून सहाही विभागीय कार्यालयात अपंग बांधवांना त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, कार्यालयांच्या पायऱ्या चढण्यासाठी त्यांना द्राविडी प्राणायाम करावे लागणार आहे. प्रहार संघटनेच्या वतीने गेल्या सोमवारी (दि.२४) महापालिका मुख्यालयासमोर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंगांच्या प्रलंबित प्रश्नी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर, बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासह आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली असता आयुक्त व बच्चू कडू यांच्यात वादविवाद होऊन कडू यांनी थेट आयुक्तांवरच हात उगारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर, महापालिकेने तातडीने अपंग बांधवांना अंदाजपत्रकातील एकूण ३ टक्के रकमेतून विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी १८ कलमी कृती आराखडा तयार करत दहा अधिकाऱ्यांवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली. मात्र, या आराखड्यात महापालिकेच्या कुठल्याही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना नाहीत. ‘लोकमत’ने मनपा मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांच्या इमारतींची पाहणी केली असता, विभागीय कार्यालयात कुठेही रॅम्पची सुविधा आढळून आलेली नाही. पंचवटी विभागीय कार्यालयाची नव्यानेच इमारत बांधण्यात आलेली आहे. राजीव गांधी भवनमध्ये एकाच ठिकाणी रॅम्पमहापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर एक छोटेखानी रॅम्प आहे. तेथून अपंग बांधवांना लिफ्टची सुविधा आहे. परंतु, मुख्यालयातील लिफ्ट बेभरवशाची बनलेली आहे. सदर लिफ्ट कधीहीबंद पडून त्यात माणसे अडकून पडण्याच्या अनेकदा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ‘लिफ्टपेक्षा पायऱ्याच बऱ्या’ अशीच भावना धडधाकट माणसांचीही होते. महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र रॅम्पची सुविधा नाही. त्यामुळे अपंग बांधवांना पूर्व दरवाजाने जावे लागते. त्याठिकाणीही सुरक्षा व्यवस्था असते. या प्रवेशद्वारातून पदाधिकारी, अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे बऱ्याचदा सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. अनेकदा सदर प्रवेशद्वार कुलूपबंदच असते.