शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई सैराट; पलायनात वाढ

By admin | Updated: July 24, 2016 23:21 IST

धक्कादायक : आकडेवारीतून निष्कर्ष, युवतींची फसवणूक होत असल्याचा दावा; माहिती अधिकारात बाब उघड

 नाशिक : तरुणाईला वेड लावणारा ‘सैराट’ काही महिन्यांपूर्वी आला असला, तरी गेल्या काही वर्षांत एकूणच तरुणाईच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फक्त मालेगाव व मनमाड शहरातून गेल्या अडीच वर्षांत तब्बल ३९१ युवक-युवती व अल्पवयीन मुले-मुली घराबाहेर पडल्याचे पुढे आले आहे. कुटुंबीयांकडून प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याची कथा सांगणारा ‘सैराट’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजला. या चित्रपटाने समाजातील जातवास्तवावरही झगझगीत प्रकाश टाकला. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून युवक-युवतींच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात प्रातिनिधिकरीत्या मालेगाव व मनमाड या दोन शहरांच्या पोलीस ठाण्यांतील आकडेवारी पाहिल्यास हे चित्र स्पष्ट होते. मालेगावमधून सन २०१४ मध्ये ४० तरुण, ६१ तरुणी, २०१५ मध्ये ४३ तरुण, ५६ तरुणी, सन २०१६ मध्ये (मेअखेर) १२ तरुण, २८ तरुणी हरवल्याची नोंद झाली आहे. तर मनमाड शहरातून सन २०१४ मध्ये १८ तरुण, १५ तरुणी, सन २०१५ मध्ये ७ तरुण, ९ तरुणी, तर सन २०१६ मध्ये (मेअखेर) १ तरुण, ८ तरुणी हरवल्या. दोन्ही शहरांतील मिळून एकूण १२१ तरुण व १८१ तरुणी बेपत्ता झाल्या. अर्थात, यातील ९६ तरुण व १४६ तरुणी कालांतराने घरी परत आल्या.