शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई सैराट; पलायनात वाढ

By admin | Updated: July 24, 2016 23:21 IST

धक्कादायक : आकडेवारीतून निष्कर्ष, युवतींची फसवणूक होत असल्याचा दावा; माहिती अधिकारात बाब उघड

 नाशिक : तरुणाईला वेड लावणारा ‘सैराट’ काही महिन्यांपूर्वी आला असला, तरी गेल्या काही वर्षांत एकूणच तरुणाईच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फक्त मालेगाव व मनमाड शहरातून गेल्या अडीच वर्षांत तब्बल ३९१ युवक-युवती व अल्पवयीन मुले-मुली घराबाहेर पडल्याचे पुढे आले आहे. कुटुंबीयांकडून प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याची कथा सांगणारा ‘सैराट’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजला. या चित्रपटाने समाजातील जातवास्तवावरही झगझगीत प्रकाश टाकला. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून युवक-युवतींच्या घर सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात प्रातिनिधिकरीत्या मालेगाव व मनमाड या दोन शहरांच्या पोलीस ठाण्यांतील आकडेवारी पाहिल्यास हे चित्र स्पष्ट होते. मालेगावमधून सन २०१४ मध्ये ४० तरुण, ६१ तरुणी, २०१५ मध्ये ४३ तरुण, ५६ तरुणी, सन २०१६ मध्ये (मेअखेर) १२ तरुण, २८ तरुणी हरवल्याची नोंद झाली आहे. तर मनमाड शहरातून सन २०१४ मध्ये १८ तरुण, १५ तरुणी, सन २०१५ मध्ये ७ तरुण, ९ तरुणी, तर सन २०१६ मध्ये (मेअखेर) १ तरुण, ८ तरुणी हरवल्या. दोन्ही शहरांतील मिळून एकूण १२१ तरुण व १८१ तरुणी बेपत्ता झाल्या. अर्थात, यातील ९६ तरुण व १४६ तरुणी कालांतराने घरी परत आल्या.